शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सरकारकडून सहकाराची गळचेपी

By admin | Updated: October 10, 2016 01:04 IST

संगमनेर : आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे

संगमनेर : आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. मात्र संगमनेर तालुक्यात सहकारामुळे आर्थिक क्रांती निर्माण झाली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीमुळे दुष्काळी संगमनेर तालुक्यात संपन्नता आली. संगमनेरच्या सहकारातून निर्माण झालेली आर्थिक क्रांती दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले आहे.संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे लोकविकास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आ .डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, रणजितसिंह देशमुख, भाऊसाहेब कुटे, शिवाजीराव थोरात, सभापती रावसाहेब नवले, सुरेशराव थोरात, आबासाहेब थोरात, माधव हासे, संतोष हासे आदी उपस्थित होते.निंबाळकर म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांनी दिलेल्या आदर्श विचारांतून संगमनेर तालुका राज्यात अग्रेसर आहे. आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व सहकारी संस्था सुरळीत सुरु असून मॉडेल ठरावे असे काम सहकाराच्या माध्यमातून येथे सुरु आहे. मात्र आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. हे सरकार उत्पादक व शेतकऱ्यांचे नसून ग्राहक व्यापारी लोकांचे हीत जोपासणारे आहे. रिझर्व्ह बँकेकडून सहकार संपविण्याचे काम सुरु आहे. सहकार क्षेत्र टिकवायचे असेल तर तरुण पिढीला विकासाची माहिती पटवून दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.आ. थोरात म्हणाले की, तालुक्यात पतसंस्थांचेही मोठे जाळे निर्माण झाले असून, १५६ पतसंस्था प्रगतीपथावर आहेत. तालुक्याची अर्थव्यवस्था बदलण्याचे काम सहकारी संस्था व पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहे. मधुकर भावे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यात सहकार वाढवला. सहकाराचे प्रशिक्षण देणारे विद्यापीठ हे संगमनेर तालुक्यात आहे. सहकाराने या तालुक्यात मोठे परिवर्तन झाले असून, सहकारी संस्था, पतसंस्था, व्यापार आणि शेतीचे नियोजन चांगले आहे, असे आ. तांबे म्हणाले. यावेळी अनिल देशमुख, अमित पंडित, आर .एम. कातोरे, संपतराव गोडगे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, सतीश कानवडे, चंद्रकांत कडलग आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भारत शेलकर, सूत्रसंचालन जिजाबा हासे यांनी केले. भाऊसाहेब खतोडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)