शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

सरकारकडून सहकाराची गळचेपी

By admin | Updated: October 10, 2016 01:04 IST

संगमनेर : आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे

संगमनेर : आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. मात्र संगमनेर तालुक्यात सहकारामुळे आर्थिक क्रांती निर्माण झाली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीमुळे दुष्काळी संगमनेर तालुक्यात संपन्नता आली. संगमनेरच्या सहकारातून निर्माण झालेली आर्थिक क्रांती दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले आहे.संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे लोकविकास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आ .डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, रणजितसिंह देशमुख, भाऊसाहेब कुटे, शिवाजीराव थोरात, सभापती रावसाहेब नवले, सुरेशराव थोरात, आबासाहेब थोरात, माधव हासे, संतोष हासे आदी उपस्थित होते.निंबाळकर म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांनी दिलेल्या आदर्श विचारांतून संगमनेर तालुका राज्यात अग्रेसर आहे. आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व सहकारी संस्था सुरळीत सुरु असून मॉडेल ठरावे असे काम सहकाराच्या माध्यमातून येथे सुरु आहे. मात्र आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. हे सरकार उत्पादक व शेतकऱ्यांचे नसून ग्राहक व्यापारी लोकांचे हीत जोपासणारे आहे. रिझर्व्ह बँकेकडून सहकार संपविण्याचे काम सुरु आहे. सहकार क्षेत्र टिकवायचे असेल तर तरुण पिढीला विकासाची माहिती पटवून दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.आ. थोरात म्हणाले की, तालुक्यात पतसंस्थांचेही मोठे जाळे निर्माण झाले असून, १५६ पतसंस्था प्रगतीपथावर आहेत. तालुक्याची अर्थव्यवस्था बदलण्याचे काम सहकारी संस्था व पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहे. मधुकर भावे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यात सहकार वाढवला. सहकाराचे प्रशिक्षण देणारे विद्यापीठ हे संगमनेर तालुक्यात आहे. सहकाराने या तालुक्यात मोठे परिवर्तन झाले असून, सहकारी संस्था, पतसंस्था, व्यापार आणि शेतीचे नियोजन चांगले आहे, असे आ. तांबे म्हणाले. यावेळी अनिल देशमुख, अमित पंडित, आर .एम. कातोरे, संपतराव गोडगे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, सतीश कानवडे, चंद्रकांत कडलग आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भारत शेलकर, सूत्रसंचालन जिजाबा हासे यांनी केले. भाऊसाहेब खतोडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)