शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची हजार रुपयांची मदत म्हणजे बुडत्याला काडीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST

(डमी) श्रीरामपूर : समाजातील निराधार, अपंग, विधवा महिलांकरिता राज्य सरकारने दिलेल्या अनुदान स्वरूपातील मदतीचे ४३ कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर ...

(डमी)

श्रीरामपूर : समाजातील निराधार, अपंग, विधवा महिलांकरिता राज्य सरकारने दिलेल्या अनुदान स्वरूपातील मदतीचे ४३ कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संकटात गरिबांना आधार देण्याचा सरकारचा याद्वारे प्रयत्न आहे.

सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गत महिन्याला एक हजार रुपये अनुदान लाभार्थ्याला दिले जाते. लॉकडाऊन व कोरोना संकटामुळे सरकारने मे महिन्याचे अनुदानाचे पैसे एप्रिल महिन्यात आगाऊ देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, एप्रिल व मे महिन्याचे दोन हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय अनुदानाची मागणी लक्षात घेऊन पैसे वितरित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली आहे. लवकरच पैसे लाभार्थ्यांच्या हाती पडतील, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यात एक लाख ७० हजार ४०१ लाभार्थ्यांना ४३ कोटी ७६ लाख १८ हजार ४०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे समाजातील वृद्ध, निराधार, दिव्यांगांना आधार मिळाला आहे.

----

योजनानिहाय अनुदान

संजय गांधी निराधार योजना : ९ कोटी ६३ लाख

श्रावणबाळ योजना : ३२ कोटी रुपये

इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन : एक कोटी ७६ लाख

राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना : ११ लाख ७३ हजार.

दिव्यांग निवृत्ती वेतन योजना : ५५ हजार २०० रुपये.

-----

कुटुंब लाभ योजनेला २५ लाख रुपये

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा स्त्रीचे निधन झाल्यास, त्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मदतीपोटी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना २५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहेत.

-----

सरकारकडून मिळणारे मदतीचे एक हजार रुपयांचे अनुदान तुटपुंजे आहे. विशेषतः कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेला अडचणींना सामोरे जावे लागते. एक हजार रुपयांमध्ये कुटुंबाचा खर्च भागवता येऊ शकत नाही. मला स्वतःला दोन हजार रुपये घरभाड्यासाठी भरावे लागतात.

रिमा राजेंद्र रानडे, लाभार्थी.

----

केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या संकट काळात जनतेला वाऱ्यावर सोडू नये. किमान सन्मानाने जीवन जगता येईल, अशा स्वरूपाचे आर्थिक साहाय्य करावे. एक हजार रुपये मदत किंवा एका व्यक्तीला महिन्याला पाच किलो धान्य ही गरिबांची थट्टा आहे.

जीवन सुरुडे, असंघटित कामगार व शेतमजूर संघटना, श्रीरामपूर.