शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जनतेचे प्रश्न सोडविणे सरकारचे कर्तव्य : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:33 IST

शेतक-यांचे प्रश्न , लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती हे सर्व प्रश्न व्यक्तीश: अण्णा हजारे यांच्या भल्यासाठी नाहीत. हे मुद्दे देशातील शेतकरी व जनतेचे प्रश्न असून ते सोडविणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.

राळेगण सिद्धी : शेतक-यांचे प्रश्न , लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती हे सर्व प्रश्न व्यक्तीश: अण्णा हजारे यांच्या भल्यासाठी नाहीत. हे मुद्दे देशातील शेतकरी व जनतेचे प्रश्न असून ते सोडविणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. सरकार आश्वासन देऊनही त्याचे पालन करीत नसल्याने आपण पुन्हा महात्मा गांधी जयंतीपासून राळेगण सिद्धी येथे उपोषण आंदोलन करीत असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्राद्वारे दिला.२३ मार्चपासून नवी दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाच्या ७ व्या दिवशी शेतक-यांचे प्रश्न व लोकपाल, लोकायुक्त संदर्भात केंद्र सरकारने ११ मुद्यांवर लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते. त्यावर आश्वासनांची पुर्तता होण्यासाठी सहा महिन्यांची वाट पाहू अन्यथा पुन्हा उपोषण करणार असल्याचे आपण सांगितले होते. आश्वासनानंतर ५ महिन्यांचा कालावधी उलटला तरी सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रिय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दि. २९ आॅगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे लोकपाल, लोकायुक्त कायदा २०१३ बाबत सरकार काय करीत आहे याची माहिती दिली. परंतु, लेखी आश्वासनातील ११ मुद्यांतील शेतक-यांच्या शेती मालाला स्वामिनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव देणे, वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकरी, शेतमजूर यांना किमान ५ हजार रुपये पेन्शन मिळावी. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळावी. लोकपाल व लोकायुक्त कायद्यातील कलम ६३ व कलम ४४ मधील दुरूस्ती संशोधन मागे घेणे बाबत प्रत्येक राज्यात लोकायुक्ताची स्थापना व्हावी याबाबत काहीच उल्लेख नाही. हे प्रश्न काही वैयक्तिक अण्णा हजारेंचे नाहीत. ते जनतेचे प्रश्न असून ते सोडविणे हे सरकारचे कर्तव्य असल्याने आपण या प्रश्नी आग्रही आहोत. सरकार आश्वासनांचे पालन करीत नसल्याने येत्या गांधी जयंतीपासून राळेगण सिद्धी येथे आपण उपोषण आंदोलन करणार आहोत, असा इशारा हजारे यांनी दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरanna hazareअण्णा हजारे