शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सरकारी उद्योग मोडीत घालण्याचा घाट - रंजन दाणी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू ...

ठळक मुद्दे राळेगणसिध्दीत भारत संचारची राज्यस्तरीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू पहात होत्या. म्हणून त्या कंपन्यांचे सरकारीकरण झाले. पंडित नेहरू सरकारी उद्योगांना मंदिरे म्हणत असत. ही आधुनिक भारताची मंदिरे सध्याच्या सरकारने उध्वस्त करायला घेतलीय की काय? असा सवाल एनएफटीइ संघटनेचे परिमंडल सचिव कॉ. रंजन दाणी यांनी केला.नॅशनल फेडरेशन आॅफ टेलिकॉम एम्लॉईज संघटनेच्या महाराष्ट्र परिमंडल कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक रविवारी राळेगण सिद्धी येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉ. हरीष मोक्ताली, औरंगाबादचे मु्ख्यव्यवस्थापक अरविंद वडनेरकर, व्यवस्थापक अमन जायस्वाल होते. अध्यक्षस्थानी कॉ. विजय बांडी होते.दाणी म्हणाले, सर्वाधिक पगार आणि सर्वाधिक पेन्शन घेणारा कर्मचारी बीएसएनएलचा आहे आणि हे कॉ. ओ.पी. गुप्ता या कर्मयोग्याचे देणे आहे. गेल्या दोन वर्षांचा बोनस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. चंदेश्वर सिंग यांनी फायद्याचे कलम वगळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि त्यांच्या कार्यालयाने त्याची दखल घेतली. पुढील महिन्यात अमृतसर येथे संघटनेचे राष्ट्रिय अधिवेशन असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र सामिल व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. अमन जायस्वाल म्हणाले, औद्योगिक कलह आणि शांती विशद करताना सर्वांनीच आधी संवाद करावा आणि मगच कायदा पाहावा. कुणाही कर्मचा-याची अन्यायकारक बदली होऊ नये. तसा अन्याय होत असेल तर प्रशासन पीडिताच्या पाठीशी असेल. अरविंद वडनेरकर यांनी तिसरा वेतन करार हा मुद्दा नसून चौथा किंवा पाचवा वेतन करार हा मुद्दा आहे असल्याचे सांगील्यावर टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. फोरजी साठी बीएसएनएल प्रयत्न करत असल्याचे सांगून या नंतर टेलीकॉम सेक्टरमध्ये केवळ चार आॅपरेटर राहतील, असा दावा त्यांनी केला.बैठकीस सरपंच रोहिणी गाजरे, कॉ. विजय पिंपरकर, कॉ. प्रदीप जाधव, कॉ. विजय शिपनकर, कॉ. सुनिता पाटील, कॉ. रमेश शिंदे, कॉ. सुनिल धर्माधिकारी, कॉ. शिरीष अकोलकर, कॉ. भाऊ खाकाळ, कॉ. व्हि.एस हंपे, कॉ. अशोक पिल्ले, कॉ. गोरख अकोलकर, रोहिदास पठारे उपस्थित होते. सूत्रसंचालन कॉ. अशोक हिंगे यांनी केले. काँ. त्रिंबक दुधाडे यांनी आभार मानले.

 

  • अस्तित्वाची चिंता नको
  • भारत संचारचा मार्केट शेअर पंधरा ते वीस टक्के राहिला तरी बावीस हजार कोटीचा व्यवसाय होईल एवढी प्रचंड क्षमता आपल्यात असल्याने कंपनीच्या अस्तित्वाची चिंता करु नका, परंतु त्यासाठी आपणाला सातत्यपुर्ण प्रयत्न करावे लागतील, असा सल्ला अरविंद वडनेरकर यांनी दिला.
टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरBSNLबीएसएनएल