शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी उद्योग मोडीत घालण्याचा घाट - रंजन दाणी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू ...

ठळक मुद्दे राळेगणसिध्दीत भारत संचारची राज्यस्तरीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू पहात होत्या. म्हणून त्या कंपन्यांचे सरकारीकरण झाले. पंडित नेहरू सरकारी उद्योगांना मंदिरे म्हणत असत. ही आधुनिक भारताची मंदिरे सध्याच्या सरकारने उध्वस्त करायला घेतलीय की काय? असा सवाल एनएफटीइ संघटनेचे परिमंडल सचिव कॉ. रंजन दाणी यांनी केला.नॅशनल फेडरेशन आॅफ टेलिकॉम एम्लॉईज संघटनेच्या महाराष्ट्र परिमंडल कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक रविवारी राळेगण सिद्धी येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉ. हरीष मोक्ताली, औरंगाबादचे मु्ख्यव्यवस्थापक अरविंद वडनेरकर, व्यवस्थापक अमन जायस्वाल होते. अध्यक्षस्थानी कॉ. विजय बांडी होते.दाणी म्हणाले, सर्वाधिक पगार आणि सर्वाधिक पेन्शन घेणारा कर्मचारी बीएसएनएलचा आहे आणि हे कॉ. ओ.पी. गुप्ता या कर्मयोग्याचे देणे आहे. गेल्या दोन वर्षांचा बोनस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. चंदेश्वर सिंग यांनी फायद्याचे कलम वगळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि त्यांच्या कार्यालयाने त्याची दखल घेतली. पुढील महिन्यात अमृतसर येथे संघटनेचे राष्ट्रिय अधिवेशन असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र सामिल व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. अमन जायस्वाल म्हणाले, औद्योगिक कलह आणि शांती विशद करताना सर्वांनीच आधी संवाद करावा आणि मगच कायदा पाहावा. कुणाही कर्मचा-याची अन्यायकारक बदली होऊ नये. तसा अन्याय होत असेल तर प्रशासन पीडिताच्या पाठीशी असेल. अरविंद वडनेरकर यांनी तिसरा वेतन करार हा मुद्दा नसून चौथा किंवा पाचवा वेतन करार हा मुद्दा आहे असल्याचे सांगील्यावर टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. फोरजी साठी बीएसएनएल प्रयत्न करत असल्याचे सांगून या नंतर टेलीकॉम सेक्टरमध्ये केवळ चार आॅपरेटर राहतील, असा दावा त्यांनी केला.बैठकीस सरपंच रोहिणी गाजरे, कॉ. विजय पिंपरकर, कॉ. प्रदीप जाधव, कॉ. विजय शिपनकर, कॉ. सुनिता पाटील, कॉ. रमेश शिंदे, कॉ. सुनिल धर्माधिकारी, कॉ. शिरीष अकोलकर, कॉ. भाऊ खाकाळ, कॉ. व्हि.एस हंपे, कॉ. अशोक पिल्ले, कॉ. गोरख अकोलकर, रोहिदास पठारे उपस्थित होते. सूत्रसंचालन कॉ. अशोक हिंगे यांनी केले. काँ. त्रिंबक दुधाडे यांनी आभार मानले.

 

  • अस्तित्वाची चिंता नको
  • भारत संचारचा मार्केट शेअर पंधरा ते वीस टक्के राहिला तरी बावीस हजार कोटीचा व्यवसाय होईल एवढी प्रचंड क्षमता आपल्यात असल्याने कंपनीच्या अस्तित्वाची चिंता करु नका, परंतु त्यासाठी आपणाला सातत्यपुर्ण प्रयत्न करावे लागतील, असा सल्ला अरविंद वडनेरकर यांनी दिला.
टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरBSNLबीएसएनएल