शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सरकारी उद्योग मोडीत घालण्याचा घाट - रंजन दाणी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू ...

ठळक मुद्दे राळेगणसिध्दीत भारत संचारची राज्यस्तरीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू पहात होत्या. म्हणून त्या कंपन्यांचे सरकारीकरण झाले. पंडित नेहरू सरकारी उद्योगांना मंदिरे म्हणत असत. ही आधुनिक भारताची मंदिरे सध्याच्या सरकारने उध्वस्त करायला घेतलीय की काय? असा सवाल एनएफटीइ संघटनेचे परिमंडल सचिव कॉ. रंजन दाणी यांनी केला.नॅशनल फेडरेशन आॅफ टेलिकॉम एम्लॉईज संघटनेच्या महाराष्ट्र परिमंडल कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक रविवारी राळेगण सिद्धी येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉ. हरीष मोक्ताली, औरंगाबादचे मु्ख्यव्यवस्थापक अरविंद वडनेरकर, व्यवस्थापक अमन जायस्वाल होते. अध्यक्षस्थानी कॉ. विजय बांडी होते.दाणी म्हणाले, सर्वाधिक पगार आणि सर्वाधिक पेन्शन घेणारा कर्मचारी बीएसएनएलचा आहे आणि हे कॉ. ओ.पी. गुप्ता या कर्मयोग्याचे देणे आहे. गेल्या दोन वर्षांचा बोनस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. चंदेश्वर सिंग यांनी फायद्याचे कलम वगळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि त्यांच्या कार्यालयाने त्याची दखल घेतली. पुढील महिन्यात अमृतसर येथे संघटनेचे राष्ट्रिय अधिवेशन असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र सामिल व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. अमन जायस्वाल म्हणाले, औद्योगिक कलह आणि शांती विशद करताना सर्वांनीच आधी संवाद करावा आणि मगच कायदा पाहावा. कुणाही कर्मचा-याची अन्यायकारक बदली होऊ नये. तसा अन्याय होत असेल तर प्रशासन पीडिताच्या पाठीशी असेल. अरविंद वडनेरकर यांनी तिसरा वेतन करार हा मुद्दा नसून चौथा किंवा पाचवा वेतन करार हा मुद्दा आहे असल्याचे सांगील्यावर टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. फोरजी साठी बीएसएनएल प्रयत्न करत असल्याचे सांगून या नंतर टेलीकॉम सेक्टरमध्ये केवळ चार आॅपरेटर राहतील, असा दावा त्यांनी केला.बैठकीस सरपंच रोहिणी गाजरे, कॉ. विजय पिंपरकर, कॉ. प्रदीप जाधव, कॉ. विजय शिपनकर, कॉ. सुनिता पाटील, कॉ. रमेश शिंदे, कॉ. सुनिल धर्माधिकारी, कॉ. शिरीष अकोलकर, कॉ. भाऊ खाकाळ, कॉ. व्हि.एस हंपे, कॉ. अशोक पिल्ले, कॉ. गोरख अकोलकर, रोहिदास पठारे उपस्थित होते. सूत्रसंचालन कॉ. अशोक हिंगे यांनी केले. काँ. त्रिंबक दुधाडे यांनी आभार मानले.

 

  • अस्तित्वाची चिंता नको
  • भारत संचारचा मार्केट शेअर पंधरा ते वीस टक्के राहिला तरी बावीस हजार कोटीचा व्यवसाय होईल एवढी प्रचंड क्षमता आपल्यात असल्याने कंपनीच्या अस्तित्वाची चिंता करु नका, परंतु त्यासाठी आपणाला सातत्यपुर्ण प्रयत्न करावे लागतील, असा सल्ला अरविंद वडनेरकर यांनी दिला.
टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरBSNLबीएसएनएल