शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे कर्जवसुली स्थगितीचे आदेश धुडकावले; जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी

By शिवाजी पवार | Updated: January 9, 2024 18:30 IST

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्याच्या विरूद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले.

श्रीरामपूर (अहमदनगर): राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्याच्या विरूद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले. सहकार अधिनियमातील कलम ७९ अमधील तरतुदीच्या या उल्लंघनामुळे संचालक मंडळाला बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांची भेट घेऊन केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा निर्णय वादात सापडला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष यु्वराज जगताप, शिवाजी जवरे, साहेबराव चोरमल, दिलीप औताडे, विजय मते यांनी मंगळवारी विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांची मंगळवारी भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात नगरच्या जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी केली. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. राज्य सरकारने १० नोव्हेंबर २०२३च्या आदेशात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सवलती देण्याबाबत निर्णय घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती दिली. मात्र नगर जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखाने व जिल्हा बँकेने शेतकरी व सरकार विरोधी भूमिका घेतली. 

१४ डिसेंबर २०२३ मध्ये नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी शेती कर्जाची सक्तीची वसुली करू नये असे आदेश काढूनही जिल्हा बँकेने २९ डिसेंबरला सरकारच्या आदेशाची व्याख्या बदलून संचालक मंडळाचा ठराव केला. त्यात कारखान्यांच्या माध्यमातून ऊस बिलातून पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दुधासाठी दिलेले खेळते भांडवल आदी कर्ज वसूल करण्याचे धोरण घेतले. वास्तविक सरकारच्या निर्णयाद्वारे खरीप पिकाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, पुनर्गठण केलेल्या कर्जाचे मध्यम मुदतीत रूपांतर, मध्यम मुदतीत रूपांतर केलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज असे निर्देश होते. पुण्याच्या सहकार आयुक्तांनीही ५ जानेवारीला तसे आदेश सर्व बँकांना तसेच सहकार विभागाच्या अधिकार्यांना बजावले. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मात्र ठराव करून नियमबाह्य परिपत्रक काढले. जिल्हा बँकेने सरकारचे आदेश पाळणे बंधनकारक ठरते. आदेशांचे अनुपालन न झाल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याचे अधिकार विभागीय सहनिबंधक यांना आहेत. त्या अधिकारांचा वापर निबंधकांनी करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. ऊस पिकातून जेमतेम मिळणाऱ्या उत्पादनातून कौटुंबिक खर्च शेतकऱ्यांना भागवयाचा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधीज्ञ अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर