शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सरकारचे कर्जवसुली स्थगितीचे आदेश धुडकावले; जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी

By शिवाजी पवार | Updated: January 9, 2024 18:30 IST

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्याच्या विरूद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले.

श्रीरामपूर (अहमदनगर): राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्याच्या विरूद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले. सहकार अधिनियमातील कलम ७९ अमधील तरतुदीच्या या उल्लंघनामुळे संचालक मंडळाला बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांची भेट घेऊन केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा निर्णय वादात सापडला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष यु्वराज जगताप, शिवाजी जवरे, साहेबराव चोरमल, दिलीप औताडे, विजय मते यांनी मंगळवारी विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांची मंगळवारी भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात नगरच्या जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी केली. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. राज्य सरकारने १० नोव्हेंबर २०२३च्या आदेशात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सवलती देण्याबाबत निर्णय घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती दिली. मात्र नगर जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखाने व जिल्हा बँकेने शेतकरी व सरकार विरोधी भूमिका घेतली. 

१४ डिसेंबर २०२३ मध्ये नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी शेती कर्जाची सक्तीची वसुली करू नये असे आदेश काढूनही जिल्हा बँकेने २९ डिसेंबरला सरकारच्या आदेशाची व्याख्या बदलून संचालक मंडळाचा ठराव केला. त्यात कारखान्यांच्या माध्यमातून ऊस बिलातून पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दुधासाठी दिलेले खेळते भांडवल आदी कर्ज वसूल करण्याचे धोरण घेतले. वास्तविक सरकारच्या निर्णयाद्वारे खरीप पिकाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, पुनर्गठण केलेल्या कर्जाचे मध्यम मुदतीत रूपांतर, मध्यम मुदतीत रूपांतर केलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज असे निर्देश होते. पुण्याच्या सहकार आयुक्तांनीही ५ जानेवारीला तसे आदेश सर्व बँकांना तसेच सहकार विभागाच्या अधिकार्यांना बजावले. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मात्र ठराव करून नियमबाह्य परिपत्रक काढले. जिल्हा बँकेने सरकारचे आदेश पाळणे बंधनकारक ठरते. आदेशांचे अनुपालन न झाल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याचे अधिकार विभागीय सहनिबंधक यांना आहेत. त्या अधिकारांचा वापर निबंधकांनी करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. ऊस पिकातून जेमतेम मिळणाऱ्या उत्पादनातून कौटुंबिक खर्च शेतकऱ्यांना भागवयाचा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधीज्ञ अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर