शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे सरकार गोंधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे; परंतु सरकारकडून उपाययोजना करण्यास कमालीचा विलंब होत असल्याचे सांगून मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे सरकार पुरते ...

अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे; परंतु सरकारकडून उपाययोजना करण्यास कमालीचा विलंब होत असल्याचे सांगून मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे सरकार पुरते गोंधळले आहे, असा आरोप भाजपचे माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी शुक्रवारी येथे केला.

बुऱ्हाणनगर येथील आरोग्य केंद्रास कर्डिले यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, की कोरोना संसर्गात नगर जिल्‍हा धोकादायक वळणावर आहे. त्यामुळे नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. जिल्‍हा प्रशासनाने आरोग्‍य संदर्भातील जलद गतीने विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. राहुरी मतदारसंघातील नगर तालुका, पाथर्डी तालुका व राहुरी तालुक्‍यामधील प्रत्‍येक गावात लसीकरण केंद्र सुरू करावेत. जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तालुक्‍यातील मोठ-मोठ्या बाजारपेठांच्‍या गावांमध्‍ये कोरोना सेंटर व चाचणी केंद्र सुरू करावेत. दिवसेंदिवस मृत्‍यूचे प्रमाण वाढत आहे. प्रत्‍येक गावामध्‍ये कोरोनाचे रुग्‍ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ग्रामीण भागातही आता कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्‍य सरकारच्‍या उपाययोजना कमी पडत असल्‍याचे निदर्शनात येत आहे. मंत्र्याचे गोंधळ चव्‍हाट्यावर येत असल्‍यामुळे सरकार अस्‍वस्‍थ झाले आहे. एकामागून एक मंत्र्यांना आपल्‍या पराक्रमामुळे राजीनामा देण्‍याची वेळ येत आहे. सरकार गोंधळलेल्‍या अवस्‍थेत असल्‍यामुळे कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्‍यास वेळ लागत असल्‍याचे कर्डिले म्हणाले.