शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे सरकार गोंधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे; परंतु सरकारकडून उपाययोजना करण्यास कमालीचा विलंब होत असल्याचे सांगून मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे सरकार पुरते ...

अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे; परंतु सरकारकडून उपाययोजना करण्यास कमालीचा विलंब होत असल्याचे सांगून मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे सरकार पुरते गोंधळले आहे, असा आरोप भाजपचे माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी शुक्रवारी येथे केला.

बुऱ्हाणनगर येथील आरोग्य केंद्रास कर्डिले यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, की कोरोना संसर्गात नगर जिल्‍हा धोकादायक वळणावर आहे. त्यामुळे नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. जिल्‍हा प्रशासनाने आरोग्‍य संदर्भातील जलद गतीने विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. राहुरी मतदारसंघातील नगर तालुका, पाथर्डी तालुका व राहुरी तालुक्‍यामधील प्रत्‍येक गावात लसीकरण केंद्र सुरू करावेत. जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तालुक्‍यातील मोठ-मोठ्या बाजारपेठांच्‍या गावांमध्‍ये कोरोना सेंटर व चाचणी केंद्र सुरू करावेत. दिवसेंदिवस मृत्‍यूचे प्रमाण वाढत आहे. प्रत्‍येक गावामध्‍ये कोरोनाचे रुग्‍ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ग्रामीण भागातही आता कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्‍य सरकारच्‍या उपाययोजना कमी पडत असल्‍याचे निदर्शनात येत आहे. मंत्र्याचे गोंधळ चव्‍हाट्यावर येत असल्‍यामुळे सरकार अस्‍वस्‍थ झाले आहे. एकामागून एक मंत्र्यांना आपल्‍या पराक्रमामुळे राजीनामा देण्‍याची वेळ येत आहे. सरकार गोंधळलेल्‍या अवस्‍थेत असल्‍यामुळे कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्‍यास वेळ लागत असल्‍याचे कर्डिले म्हणाले.