शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने ग्रामीण विकास साधला

By admin | Updated: August 29, 2014 23:37 IST

लोणी: राज्यातील आघाडी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले़ विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या दारापर्यंत सुविधा आणल्या आहेत, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़

लोणी: राज्यातील आघाडी सरकारने ग्रामीण भागाचा मोठा विकास केला़ शेतकरी हिताचे निर्णय घेतले़ विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या दारापर्यंत सुविधा आणल्या आहेत, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ७५ लाख रुपये खर्चाच्या ग्रामसचिवालयाचे लोकार्पण व नारी भवनाचे उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते़ विखे म्हणाले, राज्यात आघाडी सरकारच्या कामामुळे ग्रामपंचायती सक्षम झाल्या़ गावाच्या विकासाचे अधिकार ग्रामसभेला दिले म्हणूनच सचिवालयासारख्या इमारती उभ्या राहिल्या़ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे गावे स्वच्छ झाली़ शौचालये उभी राहिली़ खेडेगावात ई-सुविधा केंद्र सुरु झाली़ या केंद्रांमध्ये १६ प्रकारचे दाखले मिळू लागले़ त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला़ लोणीसाठी ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्यात असून, २०३० सालापर्यंत १ लाख लोकसंख्या गृहित धरुन ही योजना साकारली जात असल्याचे विखे यांनी सांगितले़ यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार सुभाष दळवी, गटविकास अधिकारी कमलाकर रणदिवे, लोणीचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, जि़प़सदस्य रावसाहेब साबळे, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, सरपंच शारदा तुपे, उपसरपंच कांतादेवी आहेर, सदस्या पुष्पा आहे, शांतीनाथ आहेर, बाळासाहेब आहेर, नंदुशेठ राठी, बापूसाहेब आहेर, उत्तम घोगरे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)लोणी येथील दशक्रियाविधी घाटावर महिलांसाठी चेजिंगरुम उभारण्यासाठी ज्ञानदेव, बाळासाहेब, दिलीप या आहेर बंधुंनी त्यांच्या मातोश्री वेणुबाई यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांचा धनादेश विखे यांच्याकडे सुपूर्द केला़ यावेळी विलास घोगरे, निशीकांत घोगरे यांनी जनसेवा मंडळात प्रवेश केला़ कृषी व पणन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या कृषी व पणन निर्देशिकेचे प्रकाशन विखे यांच्या हस्ते करण्यात आले़ पद्मश्री डॉ़ विठ्ठलराव विखे यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान होत आहे़ हा दिवस सहकारी चळवळीतील ऐतिहासिक दिवस आहे़ यामुळे सहकार क्षेत्राला मोठी बळकटी मिळेल़- राधाकृष्ण विखे, कृषी व पणनमंत्री.