शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सरकारने ग्रामीण विकास साधला

By admin | Updated: August 29, 2014 23:37 IST

लोणी: राज्यातील आघाडी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले़ विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या दारापर्यंत सुविधा आणल्या आहेत, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़

लोणी: राज्यातील आघाडी सरकारने ग्रामीण भागाचा मोठा विकास केला़ शेतकरी हिताचे निर्णय घेतले़ विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या दारापर्यंत सुविधा आणल्या आहेत, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ७५ लाख रुपये खर्चाच्या ग्रामसचिवालयाचे लोकार्पण व नारी भवनाचे उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते़ विखे म्हणाले, राज्यात आघाडी सरकारच्या कामामुळे ग्रामपंचायती सक्षम झाल्या़ गावाच्या विकासाचे अधिकार ग्रामसभेला दिले म्हणूनच सचिवालयासारख्या इमारती उभ्या राहिल्या़ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे गावे स्वच्छ झाली़ शौचालये उभी राहिली़ खेडेगावात ई-सुविधा केंद्र सुरु झाली़ या केंद्रांमध्ये १६ प्रकारचे दाखले मिळू लागले़ त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला़ लोणीसाठी ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्यात असून, २०३० सालापर्यंत १ लाख लोकसंख्या गृहित धरुन ही योजना साकारली जात असल्याचे विखे यांनी सांगितले़ यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार सुभाष दळवी, गटविकास अधिकारी कमलाकर रणदिवे, लोणीचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, जि़प़सदस्य रावसाहेब साबळे, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, सरपंच शारदा तुपे, उपसरपंच कांतादेवी आहेर, सदस्या पुष्पा आहे, शांतीनाथ आहेर, बाळासाहेब आहेर, नंदुशेठ राठी, बापूसाहेब आहेर, उत्तम घोगरे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)लोणी येथील दशक्रियाविधी घाटावर महिलांसाठी चेजिंगरुम उभारण्यासाठी ज्ञानदेव, बाळासाहेब, दिलीप या आहेर बंधुंनी त्यांच्या मातोश्री वेणुबाई यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांचा धनादेश विखे यांच्याकडे सुपूर्द केला़ यावेळी विलास घोगरे, निशीकांत घोगरे यांनी जनसेवा मंडळात प्रवेश केला़ कृषी व पणन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या कृषी व पणन निर्देशिकेचे प्रकाशन विखे यांच्या हस्ते करण्यात आले़ पद्मश्री डॉ़ विठ्ठलराव विखे यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान होत आहे़ हा दिवस सहकारी चळवळीतील ऐतिहासिक दिवस आहे़ यामुळे सहकार क्षेत्राला मोठी बळकटी मिळेल़- राधाकृष्ण विखे, कृषी व पणनमंत्री.