शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

केंद्र सरकारविरोधात सरकारी कर्मचारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:27 IST

अहमदनगर : केंद्र सरकार कोरोना महामारीची ढाल पुढे करून कामगार विरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात शासकीय ...

अहमदनगर : केंद्र सरकार कोरोना महामारीची ढाल पुढे करून कामगार विरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात शासकीय कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी निषेध दिन पाळण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी निषेध दिन पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करून, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे, विलास पेद्राम, भाऊसाहेब डमाळे, संदिपान कासार, प्रसाद कराळे, विजय काकडे, रवींद्र तवले आदी उपस्थित होते.

राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक, सेवा व हक्कविषयक अधिकारांचे जतन करण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गेल्या साठ वर्षांपासून केंद्र व राज्य पातळीवर सतत लढा दिला आहे. देशातील २७ राज्यातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचारी या महासंघाच्या छत्राखाली एकसंघ राहिले आहेत. केंद्र शासनाने गेल्या आठ महिन्यात कोरोना महामारीची ढाल पुढे करून कामगार, कर्मचारी विरोधी कायदा करून कर्मचाऱ्यांच्या शाश्‍वत सेवा जीवनालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करावे, कामगारांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावी व अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट द्याव्या, प्रत्येक गरजू व्यक्तीला मनरेगामार्फत किमान दोनशे दिवसांचा रोजगार द्यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

.................

शासकीय उद्योग विकून देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांवरदेखील जाचक व मारक धोरणे लादून देशोधडीला लावण्याचे प्रकार सुरू आहे. फायद्यात असणारे शासकीय उद्योग विक्रीला काढून देशाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे देशभरातील राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांना तसेच कामगारांच्या अस्तित्वालाच आव्हान मिळाल्याचे दिसून येते. या भयग्रस्त वातावरणात ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशात निषेध दिन पाळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

..............

२६ कलेक्टर निवेदन

केंद्र सरकारच्या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने निषेध दिन पाळून विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देताना संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे, विलास पेद्राम, भाऊसाहेब डमाळे आदी. (छायाचित्र : वाजिद शेख)