शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

केंद्र सरकारविरोधात सरकारी कर्मचारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:27 IST

अहमदनगर : केंद्र सरकार कोरोना महामारीची ढाल पुढे करून कामगार विरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात शासकीय ...

अहमदनगर : केंद्र सरकार कोरोना महामारीची ढाल पुढे करून कामगार विरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात शासकीय कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी निषेध दिन पाळण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी निषेध दिन पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करून, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे, विलास पेद्राम, भाऊसाहेब डमाळे, संदिपान कासार, प्रसाद कराळे, विजय काकडे, रवींद्र तवले आदी उपस्थित होते.

राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक, सेवा व हक्कविषयक अधिकारांचे जतन करण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गेल्या साठ वर्षांपासून केंद्र व राज्य पातळीवर सतत लढा दिला आहे. देशातील २७ राज्यातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचारी या महासंघाच्या छत्राखाली एकसंघ राहिले आहेत. केंद्र शासनाने गेल्या आठ महिन्यात कोरोना महामारीची ढाल पुढे करून कामगार, कर्मचारी विरोधी कायदा करून कर्मचाऱ्यांच्या शाश्‍वत सेवा जीवनालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करावे, कामगारांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावी व अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट द्याव्या, प्रत्येक गरजू व्यक्तीला मनरेगामार्फत किमान दोनशे दिवसांचा रोजगार द्यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

.................

शासकीय उद्योग विकून देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांवरदेखील जाचक व मारक धोरणे लादून देशोधडीला लावण्याचे प्रकार सुरू आहे. फायद्यात असणारे शासकीय उद्योग विक्रीला काढून देशाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे देशभरातील राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांना तसेच कामगारांच्या अस्तित्वालाच आव्हान मिळाल्याचे दिसून येते. या भयग्रस्त वातावरणात ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशात निषेध दिन पाळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

..............

२६ कलेक्टर निवेदन

केंद्र सरकारच्या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने निषेध दिन पाळून विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देताना संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे, विलास पेद्राम, भाऊसाहेब डमाळे आदी. (छायाचित्र : वाजिद शेख)