शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

सरकार साहित्यिकांचा गळा दाबत नाही - डॉ. गिरीष प्रभुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:05 IST

साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे.

अहमदनगर : साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे. त्यामुळे साहित्यिकांचा कोणीही गळा दाबत नाही, असे १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.संमेलनासाठी नगरमध्ये आल्यानंतर डॉ़ प्रभुणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, साहित्य क्षेत्रात सरकाराची भुमिका मर्यादित असावी. मार्गदर्शक आणि अर्थसहाय्य सरकारने केले पाहिजे. ही जबाबदारी सरकार सक्षमपणे पार पडत आहे. पुस्तके छापण्यावर सरकारचे बंधन नाही. पुर्वीपेक्षा आजची परिस्थिती बदलली आहे. आज कोणीही लिहू शकतो. काय लिहावे यावरही बंधन नाही. मात्र साहित्यिकांनी आपल्या मातीशी असलेली नाळ तोडू नये. विघातक प्रकारचे लेखन करु नये. आपल्या मातीचे ऋण साहित्यातून व्यक्त केले पाहिजे. राष्ट्रीयता जपली पाहिजे. जगभरात रक्तरंजिक क्रांती झाल्या़ मात्र भारतात आपोआप बदल होत गेला. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपला देश प्रगल्भ आहे. भारतीय संस्कृतीत सामाजिक समरसतेचे मूल्य आहे. त्यामुळे भारतीय साहित्याचा विकास झाला आहे. दुर्लक्षित घटकांतील साहित्यिक उदयास आले आहेत. समरसता मुल्यांचा विकास साहित्य क्षेत्र बंधनमुक्त असल्याने झाला आहे. गुलामगिरीत कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही. त्यामुळे सरकार साहित्यिकांचा गळा दाबत आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliteratureसाहित्य