शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सरकार साहित्यिकांचा गळा दाबत नाही - डॉ. गिरीष प्रभुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:05 IST

साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे.

अहमदनगर : साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे. त्यामुळे साहित्यिकांचा कोणीही गळा दाबत नाही, असे १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.संमेलनासाठी नगरमध्ये आल्यानंतर डॉ़ प्रभुणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, साहित्य क्षेत्रात सरकाराची भुमिका मर्यादित असावी. मार्गदर्शक आणि अर्थसहाय्य सरकारने केले पाहिजे. ही जबाबदारी सरकार सक्षमपणे पार पडत आहे. पुस्तके छापण्यावर सरकारचे बंधन नाही. पुर्वीपेक्षा आजची परिस्थिती बदलली आहे. आज कोणीही लिहू शकतो. काय लिहावे यावरही बंधन नाही. मात्र साहित्यिकांनी आपल्या मातीशी असलेली नाळ तोडू नये. विघातक प्रकारचे लेखन करु नये. आपल्या मातीचे ऋण साहित्यातून व्यक्त केले पाहिजे. राष्ट्रीयता जपली पाहिजे. जगभरात रक्तरंजिक क्रांती झाल्या़ मात्र भारतात आपोआप बदल होत गेला. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपला देश प्रगल्भ आहे. भारतीय संस्कृतीत सामाजिक समरसतेचे मूल्य आहे. त्यामुळे भारतीय साहित्याचा विकास झाला आहे. दुर्लक्षित घटकांतील साहित्यिक उदयास आले आहेत. समरसता मुल्यांचा विकास साहित्य क्षेत्र बंधनमुक्त असल्याने झाला आहे. गुलामगिरीत कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही. त्यामुळे सरकार साहित्यिकांचा गळा दाबत आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliteratureसाहित्य