शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सरकार साहित्यिकांचा गळा दाबत नाही - डॉ. गिरीष प्रभुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:05 IST

साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे.

अहमदनगर : साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे. त्यामुळे साहित्यिकांचा कोणीही गळा दाबत नाही, असे १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.संमेलनासाठी नगरमध्ये आल्यानंतर डॉ़ प्रभुणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, साहित्य क्षेत्रात सरकाराची भुमिका मर्यादित असावी. मार्गदर्शक आणि अर्थसहाय्य सरकारने केले पाहिजे. ही जबाबदारी सरकार सक्षमपणे पार पडत आहे. पुस्तके छापण्यावर सरकारचे बंधन नाही. पुर्वीपेक्षा आजची परिस्थिती बदलली आहे. आज कोणीही लिहू शकतो. काय लिहावे यावरही बंधन नाही. मात्र साहित्यिकांनी आपल्या मातीशी असलेली नाळ तोडू नये. विघातक प्रकारचे लेखन करु नये. आपल्या मातीचे ऋण साहित्यातून व्यक्त केले पाहिजे. राष्ट्रीयता जपली पाहिजे. जगभरात रक्तरंजिक क्रांती झाल्या़ मात्र भारतात आपोआप बदल होत गेला. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपला देश प्रगल्भ आहे. भारतीय संस्कृतीत सामाजिक समरसतेचे मूल्य आहे. त्यामुळे भारतीय साहित्याचा विकास झाला आहे. दुर्लक्षित घटकांतील साहित्यिक उदयास आले आहेत. समरसता मुल्यांचा विकास साहित्य क्षेत्र बंधनमुक्त असल्याने झाला आहे. गुलामगिरीत कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही. त्यामुळे सरकार साहित्यिकांचा गळा दाबत आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliteratureसाहित्य