शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गाजराच्या शेतीतून मिळते चांगली कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

अकोले : तालुक्यातील गणोरे हे अवर्षण प्रवण क्षेत्रातील कोरडवाहू शेतीचे गाव. देवठाण धरण आणि विहिरी याच्या आधारावर आठमाही शेती ...

अकोले : तालुक्यातील गणोरे हे अवर्षण प्रवण क्षेत्रातील कोरडवाहू शेतीचे गाव. देवठाण धरण आणि विहिरी याच्या आधारावर आठमाही शेती केली जाते. अवघा ४०० ते ५०० मिलिमीटर पाऊस या भागात पडतो. परंतु या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गणोरे येथील तुकाराम दातीर या अल्पभूधारक शेतकऱ्यांने गाजराची शेती फुलवली आहे.

वडिलोपार्जित सुमारे २ एकर निमबागायती-कोरडवाहू शेती त्यांचा जीवन चरितार्थ चालवण्याचा आधार आहे. पारंपरिक शेतीतून येणारे उत्पन्न हे शाश्वत नसल्याने व उत्पादन खर्च डोईजड होत असताना शेतीवर कुटुंब चालवणे त्यांना अवघड जाऊ लागले. त्यावर पर्याय म्हणून गेली ५ वर्ष त्यांनी गाजर शेतीचा प्रयोग आपल्या शेतावर राबवला आणि तो कमालीचा यशस्वीही ठरला आहे. त्यांची गाजर शेती या भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. दातीर दाम्पत्य गेली ३९ वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. यापूर्वी ते पारंपरिक पिके बाजरी, मका, गहू, हरभरा, इत्यादी घ्यायचे. परंतु या पिकांना मिळणारा बाजार भाव व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ दिवसेंदिवस बसवणे त्यांना अवघड जाऊ लागले. त्यातून त्यांनी वेगवेगळ्या पिकांचा पर्याय तपासायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात पूर्वीपासून परिसरातील गावांमध्ये गावठी गाजराची शेती पहिल्यापासून केली जायची. त्यानंतर बाजारात मागणी असलेली गाजराचे बियाणे त्यांनी स्थानिक कृषी केंद्रातून उपलब्ध करून घेतले. शेतीमध्ये मिळणारे उत्पन्न आणि गाजराच्या पाल्यापासून दुधाळ जनावरांना मिळणारा चारा हा दुहेरी फायदा त्यांना आकर्षित करून गेला. त्यानंतर त्यांनी गाजर शेतीसाठी दरवर्षी २० गुंठे क्षेत्र ठेवण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी गाजर शेतीचा प्रयोग आपल्या शेतावर सर्वप्रथम वर्ष १९९० मध्ये राबवला. त्यावर्षी त्यांना गाजराला बऱ्यापैकी भाव मिळाला व खर्च वजा जाता एकरी २० हजार रुपये उत्पन्न मिळाले. चालू हंगामातही त्यांनी गाजराची शेती २० गुंठे क्षेत्रावर फुलवली आहे. गाजराचा मधूबन हा ज्ञान संस्थेचा अहमदाबाद येथील वाण त्यांनी ११ नोव्हेंबर २०२० रोजी पेरणी केला आहे. एकरी सुमारे दोन किलो बियाणे याप्रमाणे त्यांनी पेरणी केले आहे. अत्यंत कमी खर्चात कमी भांडवलात येणारे हे पीक असून त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या जमिनीवर घरचेच शेणखत दोन ट्रॉली पसरवून दिले. त्यानंतर एक फुटाची सरी पाडून त्यावर बियाण्याची पेरणी केली. पेरणीनंतर पिकाला वेळोवेळी पाणी देणे तर नियंत्रण इत्यादी कामे लक्षपूर्वक पूर्ण केली. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर गाजर पीक काढणीस तयार झाले आहे. त्यातून त्यांना एकरी खर्च वजा जाता एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्यावर्षी याच हंगामामध्ये काढलेल्या गाजरांना सुमारे ९० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना झाले होते.

....

प्रयोगाचे कौतुक

शेतकरी तुकाराम दातीर यांच्या गाजर शेतीच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे. शेतकरी परिस्थितीने कितीही गांजला तरी प्रयोग करायचे सोडत नाही. परिस्थितीवर मात करून खंबीरपणे उभा राहतो याचे हे उत्तम उदाहरण दातीर यांनी घालून दिले आहे.

...