शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

‘अच्छे दिन आने वाले है’

By admin | Updated: May 31, 2014 00:26 IST

अण्णा हजारे : मोदी सरकारवर ठेवणार लक्ष!

अहमदनगर : काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, केंद्रातील स्पष्ट बहुमतातील सरकार, नरेंद्र मोदी सरकारने दाखविलेले प्रगतीचे स्वप्न आणि काळ्या पैशांविरुद्ध उचललेले पहिले पाऊल या देशाच्या राजकारणातील घडामोडींवर भाष्य करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे काहीसे सुखावले आहेत. ‘अच्छे दिन आनेवाले है’ ही त्यांची प्रतिक्रिया बोलकी ठरावी. मोदी सरकारला कामसाठी काही काळ देण्यासोबतच त्यांच्यावर ‘लक्ष’ ठेवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच अण्णांनी नव्या सरकारचे औपचारिक स्वागत केले होते, एवढेच नव्हे तर मोदी सरकारला शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, त्यांनी प्रथमच या सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक करताना काँग्रेसच्या पराभवावरही टीका केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथमच देशातील या बदलांवर सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणतात, या नव्या सरकारने सामान्य माणसांना प्रगतीचे स्वप्न दाखविले आहे. त्यासाठी त्यांना काही वेळ दिलाच पाहिजे. या काळात त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. मात्र आगामी चार-सहा महिन्यांत जनतेला दिलेला शब्द पाळण्यात केंद्रातील सरकार अपयशी ठरल्यास पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांविरुद्ध ‘असली आझादी अभियान’च्या माध्यमातून मोहीम उघडली जाईल.’ स्पष्ट बहुमत हे देशाच्या स्थिरतेसाठी उत्तम ठरेल. यामुळे विकासाला चालना मिळेल, असे सांगतानाच ‘मोदींच्या विजयात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा, जनतेला जिंकणारे त्यांचे वक्तृत्व आणि काँग्रेसचे अपयशी सरकार कारणीभूत ठरले,’ असे विश्लेषण ते मांडतात. काळ्या पैशाच्या तपासासाठी एसआयटीचे गठण आणि मंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांची आपल्या कार्यालयात नेमणूक न करण्याच्या निर्णयांचेही त्यांनी स्वागत केले आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारला आपलेच मंत्री विविध घोटाळ्यात अडकल्याने असे काही करावे, हे सुचलेच नाही. त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली, अशी टीका त्यांनी केली. रोज उघड होणारे घोटाळे, वाढत जाणार्‍या महागाईने सामान्य जनता पिचली होती. तिने आपला राग मतयंत्रातून व्यक्त केला. जनतेला घराणेशाही नकोच होती. म्हणूनच ‘माँ-बेटा आणि आता बेटी’चा पक्ष रसातळाला पोहचला, अशा शब्दात त्यांनी सोनिया गांधी-राहुल गांधी यांचे नाव न घेता टीकेची तीव्रता वाढविली. अरविंद केजरीवालांवर टीका करताना अण्णा म्हणतात, त्यांना दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून चांगली संधी मिळाली होती. चांगला कारभार करुन ‘विकासाचे नवे मॉडेल’ मांडण्याची संधी होती. मात्र फाजिल आत्मविश्वासात ते पंतप्रधान होण्यास निघाले होते. आता त्यांना पश्चाताप होतोय, पण त्याचा काय उपयोग? पुरावे असल्याशिवाय आरोप करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला़