शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

गोदाकाठचे शेतकरी आक्रमक ; जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:28 IST

तालुक्यातील गोदावरीच्या बंधा-यात दुष्काळाशी सामना करण्यासाठी साठवलेले पाणी पुन्हा नाशिक

कोपरगाव : तालुक्यातील गोदावरीच्या बंधा-यात दुष्काळाशी सामना करण्यासाठी साठवलेले पाणी पुन्हा नाशिक पाठबंधारे विभागाने पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात बंधा-याच्या फळ्या काढून पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात नदीकाठच्या सर्वच गावच्या शेकडो शेतक-यानी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी एकत्र येत कोपरगाव तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केला. तहसीलदार, तालुका पोलीस ठाणे, वीज वितरण कार्यालयालयात निवेदन देत प्रशासणाचा तीव्र शब्दात निषेध केला.गोदावरी नदीवरील हिंगणी तसेच इतरही बंधा-यात जेमतेम पाणी साठवले होते. त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे ऊर्ध गोदावरी खो-यातून २.६४ टीएमसी पाणी पूर्ण बंदोबस्तात सोडण्यात आले. आता पुन्हा बंधा-याच्या फळ्या काढून जायकवाडीला सोडण्यात येणार आहे. जर हे पाणी सोडल्यास गोदावरी नदी काठच्या सर्वच गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा योजना, जनावरांच्या पिण्याच्या तसेच चा-याचा प्रश्न या पाण्यावर अवलंबून असल्याने हेच पाणी जर पुन्हा जायकवाडीला सोडल्याने शेतक-यांचा, जनावरांचा जीवन मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातच ऊस तोडणीचा हंगाम सुरु झाल्याने ऊस तोडणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे देखील हाल होणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी, मुर्शदपूर, धारणगाव, सोनारी, कुंभारी या पाच गावातील शेतकरी आपल्या कुटंबातील मुलाबाळासहीत जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी गोदावरी नदीकाठच्या सर्वच गावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर