शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गोदाकाठचे शेतकरी आक्रमक ; जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:28 IST

तालुक्यातील गोदावरीच्या बंधा-यात दुष्काळाशी सामना करण्यासाठी साठवलेले पाणी पुन्हा नाशिक

कोपरगाव : तालुक्यातील गोदावरीच्या बंधा-यात दुष्काळाशी सामना करण्यासाठी साठवलेले पाणी पुन्हा नाशिक पाठबंधारे विभागाने पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात बंधा-याच्या फळ्या काढून पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात नदीकाठच्या सर्वच गावच्या शेकडो शेतक-यानी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी एकत्र येत कोपरगाव तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केला. तहसीलदार, तालुका पोलीस ठाणे, वीज वितरण कार्यालयालयात निवेदन देत प्रशासणाचा तीव्र शब्दात निषेध केला.गोदावरी नदीवरील हिंगणी तसेच इतरही बंधा-यात जेमतेम पाणी साठवले होते. त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे ऊर्ध गोदावरी खो-यातून २.६४ टीएमसी पाणी पूर्ण बंदोबस्तात सोडण्यात आले. आता पुन्हा बंधा-याच्या फळ्या काढून जायकवाडीला सोडण्यात येणार आहे. जर हे पाणी सोडल्यास गोदावरी नदी काठच्या सर्वच गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा योजना, जनावरांच्या पिण्याच्या तसेच चा-याचा प्रश्न या पाण्यावर अवलंबून असल्याने हेच पाणी जर पुन्हा जायकवाडीला सोडल्याने शेतक-यांचा, जनावरांचा जीवन मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातच ऊस तोडणीचा हंगाम सुरु झाल्याने ऊस तोडणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे देखील हाल होणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी, मुर्शदपूर, धारणगाव, सोनारी, कुंभारी या पाच गावातील शेतकरी आपल्या कुटंबातील मुलाबाळासहीत जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी गोदावरी नदीकाठच्या सर्वच गावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर