शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

गोदाकाठचे शेतकरी आक्रमक ; जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:28 IST

तालुक्यातील गोदावरीच्या बंधा-यात दुष्काळाशी सामना करण्यासाठी साठवलेले पाणी पुन्हा नाशिक

कोपरगाव : तालुक्यातील गोदावरीच्या बंधा-यात दुष्काळाशी सामना करण्यासाठी साठवलेले पाणी पुन्हा नाशिक पाठबंधारे विभागाने पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात बंधा-याच्या फळ्या काढून पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात नदीकाठच्या सर्वच गावच्या शेकडो शेतक-यानी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी एकत्र येत कोपरगाव तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केला. तहसीलदार, तालुका पोलीस ठाणे, वीज वितरण कार्यालयालयात निवेदन देत प्रशासणाचा तीव्र शब्दात निषेध केला.गोदावरी नदीवरील हिंगणी तसेच इतरही बंधा-यात जेमतेम पाणी साठवले होते. त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे ऊर्ध गोदावरी खो-यातून २.६४ टीएमसी पाणी पूर्ण बंदोबस्तात सोडण्यात आले. आता पुन्हा बंधा-याच्या फळ्या काढून जायकवाडीला सोडण्यात येणार आहे. जर हे पाणी सोडल्यास गोदावरी नदी काठच्या सर्वच गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा योजना, जनावरांच्या पिण्याच्या तसेच चा-याचा प्रश्न या पाण्यावर अवलंबून असल्याने हेच पाणी जर पुन्हा जायकवाडीला सोडल्याने शेतक-यांचा, जनावरांचा जीवन मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातच ऊस तोडणीचा हंगाम सुरु झाल्याने ऊस तोडणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे देखील हाल होणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी, मुर्शदपूर, धारणगाव, सोनारी, कुंभारी या पाच गावातील शेतकरी आपल्या कुटंबातील मुलाबाळासहीत जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी गोदावरी नदीकाठच्या सर्वच गावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर