शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या ध्येयाने पेटून उठा

By admin | Updated: May 28, 2016 23:44 IST

अहमदनगर : मराठा समाजाच्या मनाविरुद्ध बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणाऱ्या राज्यातील युती सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही.

अहमदनगर : मराठा समाजाच्या मनाविरुद्ध बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणाऱ्या राज्यातील युती सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही. ते आरक्षण देऊच शकणार नाहीत. मराठा आरक्षण मिळवायचेच, असा निर्धार करून प्रत्येकाने पेटून उठत रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. रस्त्यावर उतरून शासनाला धाक दाखविल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे सांगत कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार नगर येथे पुकारला. नगर येथे शनिवारी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मेळावा झाला. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळे, अवधूत पवार, संजीव भोर, कृषिराज टकले, राजेंद्र निंबाळकर, शांताराम कुंजीर, प्रवीण कानवडे, कुमार वाकळे, संपत बारस्कर, निखील वारे, स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यावेळी उपस्थित होते. राणे म्हणाले, मराठा आरक्षणाची भूमिका शासन व समाजासमोर मांडण्यासाठी जिल्हानिहाय मेळावे सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी युतीचे लोक आरक्षणाचा वायदा जनतेला देत होते, पाया पडत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावून मते मागत होते. आता सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाचा विसर त्यांना पडला असून मंत्रालयात खुर्ची उबविण्यासाठी ते बसले आहेत. राणे समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले. मात्र, न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. ती उठविण्यासाठी युती शासन सक्षमपणे बाजू न्यायालयात मांडत नाही. आरएसएसच्या संविधानात आरक्षण हा मुद्दाच नाही. सरकारमधील मंत्री विनोद तावडे यांच्या समितीने आरक्षणासंदर्भात किती बैठका घेतल्या. आरक्षण देणार, हे ते नुसतेच सांगताहेत. पण कधी देणार, हे सांगत नाही. दोन वर्षात आरक्षणाविषयी त्यांनी काय केले. ते मराठा असल्याची लाज वाटते. इतरांच्या आरक्षणाला हात लावण्याची हिंमत यांच्यात नाही, मराठा आरक्षण मात्र काढलं. हे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी तुमची साथ हवी असल्याची साद राणे यांनी घातली. नकारात्मक नाही तर सकारात्मक होऊन लढायचे. मराठा आरक्षणाच्या लढाईत पेटून उठा, कोणी डिवचलं तर गप्प बसणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.आमदार संग्राम जगताप यांनी आरक्षणासाठी राणे यांनी मराठा संघटनांना एकछत्र करण्याचे यशस्वी पाऊल टाकले. मराठ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर नुसते उभे राहिले तरी आरक्षण द्यावे लागेल, असे सांगत मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याची तयारी दर्शविली. आरक्षणासाठी मराठा समाजाने एक भूमिका घेऊन ठाम रहा. आमचा पाठिंबा असल्याचे आश्वासन जगताप यांनी दिले. महापौर कळमकर, निखील वारे, गजेंद्र दांगट, संतोष गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. शांताराम कुंजीर यांनी मराठा समाज आरक्षणाची स्थिती मांडली. (प्रतिनिधी)मराठे पेटून का उठत नाहीत...बाबासाहेब पुरंदरे यांना सेनेनेच घराघरात पोहचविले. सेनेने पुरंदरे यांना मोठे केले. मराठा समाजाच्या मनाविरुध्द पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. कॉ. गोविंद पानसरे यांनी राज्यातील घराघरात खरे शिवाजी पोहचविले. मात्र त्यांना काय मिळालं. गोळ्यांनी संपविलं. पानसरे खून प्रकरणात दोन महिन्यांनी तपास अधिकारी बदलला जातो. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद सबनीस यांनी पंतप्रधानांविषयी भाष्य केले तर त्यांना सनातनवाल्यांनी धमकी दिली. तुम्ही खुलेआम हे करायचे अन् आम्ही काही बोललं तर जीभ घसरली म्हणायचे. जाट, पटेलांचे आंदोलन पेटते तर मराठे पेटून का उठत नाही, असा सवाल करत राणे यांनी तरुणांना पेटून उठण्याचे आवाहन केले. अनेक महापुरुषांची एकच जयंती साजरी होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोनदा का? असा सवाल करत सेनेने अन्य महापुरुषांच्या जयंती तिथीनुसार साजरी करण्याची हिंमत दाखवावी. ते फक्त शिवाजी महाराजांची बदनामी करताहेत. बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यावेळी आम्ही गप्प कसे बसणार, असे सांगत राणे यांनी सेनेवर टीका केली.