शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आरक्षणाच्या ध्येयाने पेटून उठा

By admin | Updated: May 28, 2016 23:44 IST

अहमदनगर : मराठा समाजाच्या मनाविरुद्ध बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणाऱ्या राज्यातील युती सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही.

अहमदनगर : मराठा समाजाच्या मनाविरुद्ध बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणाऱ्या राज्यातील युती सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही. ते आरक्षण देऊच शकणार नाहीत. मराठा आरक्षण मिळवायचेच, असा निर्धार करून प्रत्येकाने पेटून उठत रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. रस्त्यावर उतरून शासनाला धाक दाखविल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे सांगत कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार नगर येथे पुकारला. नगर येथे शनिवारी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मेळावा झाला. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळे, अवधूत पवार, संजीव भोर, कृषिराज टकले, राजेंद्र निंबाळकर, शांताराम कुंजीर, प्रवीण कानवडे, कुमार वाकळे, संपत बारस्कर, निखील वारे, स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यावेळी उपस्थित होते. राणे म्हणाले, मराठा आरक्षणाची भूमिका शासन व समाजासमोर मांडण्यासाठी जिल्हानिहाय मेळावे सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी युतीचे लोक आरक्षणाचा वायदा जनतेला देत होते, पाया पडत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावून मते मागत होते. आता सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाचा विसर त्यांना पडला असून मंत्रालयात खुर्ची उबविण्यासाठी ते बसले आहेत. राणे समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले. मात्र, न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. ती उठविण्यासाठी युती शासन सक्षमपणे बाजू न्यायालयात मांडत नाही. आरएसएसच्या संविधानात आरक्षण हा मुद्दाच नाही. सरकारमधील मंत्री विनोद तावडे यांच्या समितीने आरक्षणासंदर्भात किती बैठका घेतल्या. आरक्षण देणार, हे ते नुसतेच सांगताहेत. पण कधी देणार, हे सांगत नाही. दोन वर्षात आरक्षणाविषयी त्यांनी काय केले. ते मराठा असल्याची लाज वाटते. इतरांच्या आरक्षणाला हात लावण्याची हिंमत यांच्यात नाही, मराठा आरक्षण मात्र काढलं. हे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी तुमची साथ हवी असल्याची साद राणे यांनी घातली. नकारात्मक नाही तर सकारात्मक होऊन लढायचे. मराठा आरक्षणाच्या लढाईत पेटून उठा, कोणी डिवचलं तर गप्प बसणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.आमदार संग्राम जगताप यांनी आरक्षणासाठी राणे यांनी मराठा संघटनांना एकछत्र करण्याचे यशस्वी पाऊल टाकले. मराठ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर नुसते उभे राहिले तरी आरक्षण द्यावे लागेल, असे सांगत मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याची तयारी दर्शविली. आरक्षणासाठी मराठा समाजाने एक भूमिका घेऊन ठाम रहा. आमचा पाठिंबा असल्याचे आश्वासन जगताप यांनी दिले. महापौर कळमकर, निखील वारे, गजेंद्र दांगट, संतोष गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. शांताराम कुंजीर यांनी मराठा समाज आरक्षणाची स्थिती मांडली. (प्रतिनिधी)मराठे पेटून का उठत नाहीत...बाबासाहेब पुरंदरे यांना सेनेनेच घराघरात पोहचविले. सेनेने पुरंदरे यांना मोठे केले. मराठा समाजाच्या मनाविरुध्द पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. कॉ. गोविंद पानसरे यांनी राज्यातील घराघरात खरे शिवाजी पोहचविले. मात्र त्यांना काय मिळालं. गोळ्यांनी संपविलं. पानसरे खून प्रकरणात दोन महिन्यांनी तपास अधिकारी बदलला जातो. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद सबनीस यांनी पंतप्रधानांविषयी भाष्य केले तर त्यांना सनातनवाल्यांनी धमकी दिली. तुम्ही खुलेआम हे करायचे अन् आम्ही काही बोललं तर जीभ घसरली म्हणायचे. जाट, पटेलांचे आंदोलन पेटते तर मराठे पेटून का उठत नाही, असा सवाल करत राणे यांनी तरुणांना पेटून उठण्याचे आवाहन केले. अनेक महापुरुषांची एकच जयंती साजरी होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोनदा का? असा सवाल करत सेनेने अन्य महापुरुषांच्या जयंती तिथीनुसार साजरी करण्याची हिंमत दाखवावी. ते फक्त शिवाजी महाराजांची बदनामी करताहेत. बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यावेळी आम्ही गप्प कसे बसणार, असे सांगत राणे यांनी सेनेवर टीका केली.