शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

आम्हाला पाणी द्या; नागरिकांचा महापालिकेत आक्रोश

By अरुण वाघमोडे | Updated: March 21, 2023 14:55 IST

सिद्धार्थनगर येथील महिला, नागरिकांनी मंगळवारी दुपारी महापालिकेत पाण्यासाठी अक्रोश मोर्चा काढला होता.

अहमदनगर: आयुक्त, महापौर येतात बदलून जातात, नगरसेवक निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. आमचा मात्र, गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अनेकवेळा निवेदन दिले, आंदोलन केले मात्र पाणी आम्हाला मिळालेच नाही. असा तीव्र संताप शहरातील सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी मंगळवारी महापालिकेत व्यक्त केला.

सिद्धार्थनगर येथील महिला, नागरिकांनी मंगळवारी दुपारी महापालिकेत पाण्यासाठी अक्रोश मोर्चा काढला होता. आमचा पाण्यासाठीचा संघर्ष कधी थांबणार? असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला केला. सिद्धार्थनगरमध्ये पाण्याची पाईपलाईनच टाकलेली नाही. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. प्रभागात चार नगरसेवक आहेत मात्र आमच्या मागणीची एकही नगरसेवक दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

मनपाने किमान तात्पुरती तरी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराव यावेळी नागरिकांनी दिला. उपायुक्ती श्रीनिवास कुऱ्हे यांनी यावेळी आंदोलनकांचे निवेदन स्विकारत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.