शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आम्हाला पाणी द्या; नागरिकांचा महापालिकेत आक्रोश

By अरुण वाघमोडे | Updated: March 21, 2023 14:55 IST

सिद्धार्थनगर येथील महिला, नागरिकांनी मंगळवारी दुपारी महापालिकेत पाण्यासाठी अक्रोश मोर्चा काढला होता.

अहमदनगर: आयुक्त, महापौर येतात बदलून जातात, नगरसेवक निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. आमचा मात्र, गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अनेकवेळा निवेदन दिले, आंदोलन केले मात्र पाणी आम्हाला मिळालेच नाही. असा तीव्र संताप शहरातील सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी मंगळवारी महापालिकेत व्यक्त केला.

सिद्धार्थनगर येथील महिला, नागरिकांनी मंगळवारी दुपारी महापालिकेत पाण्यासाठी अक्रोश मोर्चा काढला होता. आमचा पाण्यासाठीचा संघर्ष कधी थांबणार? असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला केला. सिद्धार्थनगरमध्ये पाण्याची पाईपलाईनच टाकलेली नाही. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. प्रभागात चार नगरसेवक आहेत मात्र आमच्या मागणीची एकही नगरसेवक दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

मनपाने किमान तात्पुरती तरी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराव यावेळी नागरिकांनी दिला. उपायुक्ती श्रीनिवास कुऱ्हे यांनी यावेळी आंदोलनकांचे निवेदन स्विकारत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.