शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला दोन हजार रुपये भाव द्या

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

अहमदनगर : कांद्याचे भाव गडगडले आहेत़ त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, कांद्याला किमान दोन हजार रुपये भाव देण्यात यावा,

अशोक पाटील --इस्लामपूर मतदारसंघातील विद्यमान आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व आजही अबाधित आहे. येथून पुढेही ते अबाधित राहणार, राहील यात शंका नाही. त्यांच्याविरोधात असणारे सर्वच विरोधी नेते सत्तेच्या मृगजळामागे धावतात. पण त्यांना त्यात यश मिळत नाही. यामागे विरोधकांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद आणि एकाच कुटुंबात वेगवेगळी राजकीय मते असल्याची चर्चा दबक्या आवाजात नेहमीच सुरु असते.वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, सांगली जि. म. बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील या घराण्यांकडे सत्ताकेंद्रे आहेत. राष्ट्रवादीतील सर्वच नेते आणि कार्यकर्ते जयंत पाटील यांचा शब्द प्रमाण मानतात. परंतु स्थानिक पातळीवरील राजकारणात अंतर्गत मतभेद आहेत.या भक्कम असलेल्या राष्ट्रवादीविरोधात स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील, हुतात्मा संकुलनाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, अभिजित पाटील, वैभव पवार हे नेते सक्रिय आहेत. परंतु ऐन निवडणुकीच्यावेळी त्यांच्याकडून वेगवेगळ्या भूमिका बजावल्या जातात. त्यांच्यामध्ये अंतर्गत राजकीय अडथळे तसेच विरोधकांचे संघटन कोणी करायचे, या वादामुळे त्यांची ताकद नेहमीच तोकडी पडत आली आहे.आमदार जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार अद्यापही राजकारणात नाहीत. परंतु त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील मात्र सावधपणे राजकारणाबरोबर उद्योग समूहाचा आढावा घेताना दिसत आहेत. अलीकडील सहा महिन्यात त्यांनी उद्योग समूहातील बैठकांनाही हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.नानासाहेब महाडिक यांच्यापुढे सत्तास्थाने आहेत. परंतु त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या महाडिक कोणत्या पक्षात आहेत हे गुलदस्त्यात आहे. हुतात्मा संकुलनाची सर्व जबाबदारी वैभव नायकवडी यांनी आपल्या हाती घेतली आहे, तर त्यांचेच पुतणे सरपंच गौरव नायकवडी हे राजकारणात भरारी घेण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांनाही अंतर्गत अडथळे असल्याची चर्चा आहे.बोरगाव जि. प. मतदारसंघातील माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात आमदार पदाची निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेसमधीलच काही नेते त्यांना विरोध करत आहेत. त्यामुळे अद्यापही ते जि. प. मतदारसंघाच्या बाहेर पडून कोणतीही निवडणूक जिंकू शकलेले नाहीत.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले की, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, भाजयुमोचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार हे एकत्र निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करतात. परंतु ऐनवेळी त्यांच्यातच कुरघोड्या होत असल्याने याचा राष्ट्रवादीला फायदा होतो.शिराळा तालुक्यातही आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी मानसिंगराव नाईक यांचा पराभव करुन या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवला आहे. मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख हे वेगवेगळे लढल्यानेच शिवाजीराव नाईक यांना विजयश्री मिळाली. तरीही मतदार संघात भाजपची म्हणावी अशी ताकद दिसत नाही. आता पुन्हा मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख एकत्रित येऊन शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात मोट बांधत आहेत. आता आगामी राजकीय उलथापालथीकडे लक्ष लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतभिन्नता इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले की, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, भारतीय युवा मोर्चाचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार हे एकत्र निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करतात. परंतु ऐनवेळी त्यांच्यातच कुरघोड्या होत असल्याने याचा राष्ट्रवादीला फायदा होतो. जयंत पाटील यांच्याविरोधात नेहमी ऐनवेळी एकमत होताना दिसत नाही.