शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकऱ्यांना पेन्शन द्या

By admin | Updated: August 8, 2014 00:23 IST

वृध्द शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत करण्यात आला.

अहमदनगर : आयुष्यभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना उतारवयात अनेक व्याधी अथवा आजारांना सामोरे जावे लागते. काही शेतकऱ्यांना तर मुले सांभाळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. यामुळे राज्य सरकारने या वृध्द शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच जिल्ह्यात टंचाईच्या काळात चारा उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण योजना म्हणून मका बियाणांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे ५० लाख रुपयांचा निधी मागण्याचा निर्णय घेण्यात आला.सभापती बाबासाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आणि पशुसंवर्धन समितीची बैठक झाली. यात विशेष घटक योजनेसाठी अनुसूचित जाती-जमातीसाठीच्या शेतकऱ्यांचे ५०१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. योजनेसाठी १२ आॅगस्ट ही मुदत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. योजनेत नवीन विहिरीसाठी एक लाख रुपयांचा निधी आहे. बैलजोडी, पाईपलाईन, तुषार, सिंचन, आॅईल इंजिन आणि अन्य कृषी साहित्यासाठी ५० हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना आदर्श गोपालक आणि प्रगतीशील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या १० ते १२ दिवसांत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात टंचाई परिस्थितीमुळे चारा उत्पादन वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत मका बियाणे मागणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात येणार आहे. सभेला जयश्री दरेकर, सुनीता भांगरे, सुरेखा शेळके, शारदा भिंगारदिवे, सोनाली बोराटे, श्रीनिवास त्रिभुवन, मच्छिंद्र केकाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, प्रभारी कृषी विकास अधिकारी शंकपाळ आदी उपस्थित होते.या आर्थिक वर्षापासून कृषी अभियांत्रिकी योजना राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. ७३ व्या घटना दुरूस्तीनुसार राज्य सरकारचा कृषी विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग होणे आवश्यक असताना, जिल्हा परिषदेची योजना काढून घेण्यात आली आहे. याबाबत शासनाला ठराव करून ही योजना पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)