शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

विकास मंडळाचे गौडबंगाल झाकण्यासाठी घंटानादचे नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST

अहमदनगर : नगर शहरातील लाल टाकी परिसरातील अत्यंत मोक्याच्या जागेवर प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची वास्तू उभारण्याऐवजी ही जागा बिल्डरांच्या ...

अहमदनगर : नगर शहरातील लाल टाकी परिसरातील अत्यंत मोक्याच्या जागेवर प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची वास्तू उभारण्याऐवजी ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आखणाऱ्यांनी आधी टेंडरचा सर्व व्यवहार शिक्षकांपुढे मांडावा आणि मगच घंटानाद आंदोलन करावे. विकास मंडळात केलेल्या गौडबंगालाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी विरोधक घंटानादाचे नाटक करीत आहेत. सासवड अधिवेशनाचा हिशेब देण्याऐवजी संघटना बदलणारांनी असली नाटके करू नयेत. सभासद त्यांना चांगले ओळखून आहेत, अशी टीका गुरुमाऊली मंडळाचे सरचिटणीस विठ्ठल फुंदे यांनी केली.

विकास मंडळासाठी सभासदांकडून पैसे घेताना फक्त आपल्या जवळच्या लोकांकडूनच पैसे घेण्यात आले. बांधकामाचे टेंडर कुणाला आणि कसे दिले हे विश्वस्तांपैकी अध्यक्ष सोडून इतरांना माहीत आहे का? अनेक विश्वस्तांनी विकास मंडळासाठी कोणी किती निधी दिला ते जाहीर करावे. टेंडर प्रक्रिया कशी राबविली, कोणाला टेंडर दिले याचा खुलासा करावा अन्यथा विकास मंडळाच्या विरुद्ध गुरुमाऊली मंडळसुद्धा आंदोलन करेल, असा इशारा उत्तर विभागप्रमुख राजू साळवे यांनी दिला.

विकास मंडळासाठी ज्या सभासदांनी पैसे दिले आहेत, ते परत मागत आहेत. हे पैसे देताना शिक्षक बँकेचे भांडवल कमी करण्याचा नाकर्तेपणा तत्कालीन अध्यक्षांनी केला आहे. नियमबाह्यपणे कोणताही करार न करता या रकमा विकास मंडळाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. बँकेने जर या रकमेची वसुली केली तर सभासद अडचणीत येतील. विकास मंडळासाठी दिलेले पैसे परत मिळतील, अशी सभासदांना खात्री नाही. विकास मंडळाच्या इमारतीची जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव या मंडळींचा आहे, अशी टीका फुंदे यांनी केली.

..............

बँकेचा कारभार काटेकोर

शिक्षक बँकेच्या घड्याळाचा व्यवहार अत्यंत पारदर्शी आहे. ऑनलाइन किमती उपलब्ध आहेत. कंपनीचा करार सर्वांसाठी उपलब्ध आहे. नव्वद टक्के सभासदांनी घड्याळे नेलेली आहेत आणि त्याबद्दल सर्वांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत, असे असताना बँकेला बदनाम करण्यासाठी काहीजण घंटानाद करीत आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने अतिशय चोख आणि काटेकोर कारभार केला आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. यापूर्वी कधी मिळाला नाही इतका व्याजदर संचालक मंडळाने कायम ठेवींना दिला आहे, असेही फुंदे व साळवे यांनी म्हटले आहे.