शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

‘गुगल’च्या रचनेवर ‘भूगोल’ तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 13:27 IST

लोकसंख्येचा निकष पूर्ण करून तुटलेला भाग पुन्हा जोडा

अहमदनगर : लोकसंख्येचा निकष पूर्ण करून तुटलेला भाग पुन्हा जोडा...नव्याने समाविष्ट झालेला भाग पुन्हा जोडा...दूरचा भाग वगळा... भौगोलिक सलगता कायम ठेवा... अशा हरकतींवर तक्रारदारांनी त्यांचे म्हणणे बुधवारी वित्त सचिवांकडे सादर केले. वित्त सचिवांनी म्हणणे ऐकून घेतले, तर रचनेत बदल होणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तिथेच स्पष्ट केले. त्यामुळे एखादा किरकोळ बदल वगळता आहे तशीच प्रभाग रचना एक आॅक्टोबरला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना २७ आॅगस्ट रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यावर ५ सप्टेंबरपर्यंत ८३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. राज्य शासनाच्या वित्त विभागाचे सचिव राजीवकुमार मित्तल यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, सहायक नगररचना संचालक राजेश पाटील यांची उपस्थिती होती. प्रभाग रचनेवर ८३ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी २२ जणांनी हजेरी लावली. त्यामुळे दुपारी ११ वाजता सुरू झालेली ही सुनावणी दुपारी तीन वाजता संपली.जिल्हाधिका-यांवर नाराजीवित्त आयोगाचे सचिव मित्तल यांनी हरकतदारांचे म्हणणे शांतपणे ऐकले. तसेच अर्जाप्रमाणे बदल करा, अशा विनंत्याही हरकतदार करीत होते. नोंद घेतल्याचे मित्तल सांगत होते. मात्र लोकसंख्येचे गणित जुळत नसल्याने आणि एका प्रभागाची रचना दुरुस्त केली तर त्याचा सर्वच प्रभागाच्या रचनेवर परिणाम होणार असल्याचे सांगत बदल होणार नाही, असे जिल्हाधिकारी सांगत होते. त्यामुळे हरकतदारांचा हिरमोड झाला. प्रभाग रचनेत कोणताही बदल होणार नाही, असेच त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाल्याचे काही हरकतदारांनी माध्यमांना सांगितले.तर कोर्टात जाणारप्रभाग रचनेवर दिलेल्या हरकतींबाबत संबंधित अधिकारी अजिबात म्हणणे ऐकून घेत नाहीत. त्यामुळे प्रभाग रचनेत दुरुस्ती होण्याची शक्यता धूसर आहे. प्रभाग रचनेमुळे नागरिक, मतदार आणि विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवरील हरकतींबाबत गरज भासल्यास न्यायालयात याचिका दाखल करू, असे जाहीर आवाहन वसंत लोढा यांनी शासकीय विश्रामगृहासमोर उपस्थित हरकतदारांना केले.‘गुगल’च्या नकाशावर स्पष्टीकरणमहापालिकेची प्रभाग रचना प्रथमच ‘गुगल’वर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी हरकती दाखल केल्या, त्यांना म्हणणे मांडण्यासाठी गुगल नकाशाची स्क्रीनवर सोय करण्यात आली होती. सहायक नगररचना संचालक पाटील यांनी पॉइंटच्या सहाय्याने गुगलवर रचना दाखविली. तसेच हरकतदारांनीही स्क्रीनवर दिसणा-या नकाशावरच आपला भाग कसा तुटला, नव्याने कसा जोडला, हे अधिका-यांना पटवून दिले. हरकतींसाठी प्रथमच अशी व्यवस्था झाली होती.सुनावणी प्रक्रिया ही गोपनीय होती. त्यामुळे त्याचा तपशील सांगता येणार नाही. झालेल्या सुनावणी प्रक्रियेचा अहवाल २४ तारखेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. २८ सप्टेंबरला सर्व हरकतींवरील निर्णय देण्यात येणार आहे. या निर्णयासह १ आॅक्टोबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचवेळी कोणाच्या हरकती ग्राह्य धरल्या, ते कळणार आहे.-राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर