शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

खंडणीतूनच झाली गौतम हिरण यांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर ...

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले. याप्रकरणी पोलिसांनी सिन्नर (जि.नाशिक) येथून पाच आरोपींना अटक केली आहे. हिरण यांचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते असे तपासात निष्पन्न झाले.

अपहरण करण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप मुरलीधर हांडे (वय २६, माळेगाव, ता.सिन्नर), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय २५, रा.सप्तशृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर) अजय राजू चव्हाण (वय २६, पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय २९, रा.उक्कडगाव, ता.कोपरगाव) व एक २२ वर्षीय आरोपी यांचा समावेश आहे.

आरोपींकडून हिरण यांचा मोबाइल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन (एमएच १५,जीएल ४३८७) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शनिवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे या याबाबाबत माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, नगर येथील गुन्हे शाखेचे अनिल कटके, निरीक्षक संजय सानप यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यांनी शहरातील काही व्यापाऱ्यांना पैसे मागण्याचा प्रयत्न केले होता. त्यांना पैशांची गरज होती. दोघाही आरोपींविरुद्ध काही पुरावे आहेत. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींशी गंगावणे व वायकर यांचे संबंध पोलीस तपासणार आहेत, अशी माहिती मनोज पाटील यांनी दिली.

गुन्ह्यातील काही आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणखी काही आरोपी निष्पन्न होतील. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे. हिरण यांच्याकडे अपहरण झाले, त्यावेळी एक लाख ६५ हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या मारुती व्हॅनमध्येच करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गालगत आणून टाकण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

...

मदत मागण्याचा बहाणा

आपली गाडी नादुरूस्त झाल्याचा बहाणा करून हिरण यांची मदत मागितली गेली. त्यातूनच पुढे अपहरण नाट्य घडले, असे तपासात समोर आले आहे.

-----------

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

अपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हॅनमधून संशयास्पदरित्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी अनेक व्हॅनचा शोध घेतला. त्यावरून नाशिक येथील व्हॅन मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. त्यामुळे संशय बळावल्यानंतर काही तासांमध्ये सर्व आरोपींना पकडले. या गाडीत हिरण यांच्या मोबाइलसह बँकेचे चेकबूक व पावत्या सापडल्या. त्याचबरोबर आरोपींपैकी एकाने मोठी चूक केल्याने पोलिसांना फायदा मिळाला. मात्र त्याविषयी अधिक माहिती देण्यात आली नाही.

--------------

आरोपी बेसावध झाले

हिरण यांच्या हत्याकांडात गंगावणे व वायकर या दोन आरोपींना अटक झाल्याने मूळ गुन्हेगार बेसावध राहिले. त्याचा पोलिसांना लाभ मिळाला व त्यांच्यापर्यंत पोहोचता आले. गुन्हेगारांनी दहा ते पंधरा दिवस बेलापूर येथे रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. अपहरण केल्यानंतर पसार होण्याचे मार्ग शोधण्यात आले. तसेच अपहरणासाठी मारुती व्हॅनसोबतच अन्य एक गाडी वापरण्यात आली होती. मात्र त्याबाबत तपास सुरू आहे, असे पाटील म्हणाले.

--------