शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

इस्त्रायल तंत्रज्ञानाने फुलविली आंब्याची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:49 IST

शेतीसाठी आणि वीटभट्टीच्या व्यवसायासाठी प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडणारे राजापूरचे अशोक ईश्वरे यांनी दोन एकर क्षेत्रात इस्त्रायल तंत्रज्ञानाचा अवलंब करून केशर आंब्याची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी दोन एकरात बारा मेट्रीक टन आंब्यातून सुमारे सात लाखाचे उत्पन्न मिळविले आहे.

बाळासाहेब काकडेशेतीसाठी आणि वीटभट्टीच्या व्यवसायासाठी प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडणारे राजापूरचे अशोक ईश्वरे यांनी दोन एकर क्षेत्रात इस्त्रायल तंत्रज्ञानाचा अवलंब करून केशर आंब्याची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी दोन एकरात बारा मेट्रीक टन आंब्यातून सुमारे सात लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे ईश्वरे यांच्या कुटुंबात आंब्यातून आर्थिक गोडवा निर्माण झाला आहे.अशोक ईश्वरे यांचे वडील ज्ञानदेव ईश्वरे हे भूमिहीन होते. कुंभार काम करून विठ्ठल व अशोक दोघांना शिकविले. प्राथमिक शिक्षक केले. खडतर दिवस बदलले. अशोक व विठ्ठल यांनी नोकरीतील पैशातून बचत करून राजापूरमध्ये हळूहळू २५ एकर जमीन घेतली. घोड नदीवरून पाण्याची व्यवस्था केली. एक वीटभट्टी सुरू केली. शेती आणि व्यवसायाची गोडी असलेले अशोक ईश्वरे यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती घेतली आणि शेतीत लक्ष घातले.१० एकर क्षेत्रात ऊस, द्राक्ष, केळी व आंब्याची प्रत्येकी दोन एकर लागवड केली. काही क्षेत्र कलिंगड खरबुजासाठी राखीव ठेवले.आंब्याची लागवड ही कृषी विभागाच्या नियमानुसार न करता इस्त्रायल तंत्रज्ञानाचा अवलंब करून केशर, हापूस, तोतापुरी, राजापुरी, लंगडा जातीच्या आंब्याची लागवड १५ बाय १५ फुटावर केली. त्यावर ठिबक सिंचन बसविले. शेणखताचा वापर करून सेंद्रीय पध्दतीने आंब्याचे उत्पादन घेतले. पहिल्याच वर्षी बारा मेट्रीक टन उत्पादन निघाले. त्यामधून सुमारे ७ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.घोड नदी काठावरील शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीची गोडी लागण्यासाठी ईश्वरे यांनी दोन एकर सुपर सोनाका द्राक्ष लागवड केली. त्यामुळे परिसरातील तरुण शेतकरी द्राक्ष लागवडीकडे आकर्षित होऊ लागले आहेत.आमचे वडील भूमिहीन होते. त्यांनी कुंभारकीचा व्यवसाय करून आम्हा दोघा भावांना शिकविले. आम्ही प्राथमिक शिक्षक झालो. पगारातून बचत करून शेती घेतली आणि शेतीत लक्ष देण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. शेतीतून खूप समाधान, आनंद मिळत आहे, असे अशोक ईश्वरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा