शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

औरंगाबाद महामार्गावर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना ...

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना घाणीचेच दर्शन होत असून, यामुळे नगर शहराची प्रतिमा डागाळली जात आहे. याकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

नगर-औरंगाबाद महामार्ग नगर शहरातून जातो. शहरातील तपोवन रस्त्यापासून महापालिकेची हद्द सुरू होते. तपोवन रस्त्यापासून ते वसंत टेकडी या भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. झाडाझुडपांमध्ये मृत जनावरे टाकली जात आहेत. तसेच महामार्गावर व्यवसाय करणारे व्यावसायिकदेखील कचरा आणून टाकतात. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचराच-कचरा, अशी परिस्थिती आहे. महामार्गावर अतिक्रमणे आहेतच. त्यात आता भर पडली आहे ती कचऱ्याची. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तर दुर्लक्ष आहेत. परंतु हा परिसर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो. महापालिकेमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू आहे. शहरातील ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. परंतु महामार्गाकडे मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नगर-औरंगाबाद महामार्गावर पुणे ते औरंगाबाद या शहरातील वाहनांची ये-जा असते. या प्रवाशांना नगर शहरात प्रवेश करताच दुर्गंधीला सामोरे जावे लागते. नगर शहराची प्रतिमा यामुळे डागाळली जाते.

.....

महामार्गांच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची?

नगर शहरातून औरंगाबाद, पुणे, कल्याण, सोलापूर, मनमाड असे महामार्ग जातात. हे महामार्ग महापालिका हद्दीतून पुढे जातात. हे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असले तरी ते महापालिका हद्दीतून जातात. या दोन्ही यंत्रणा महामार्गाशी संबंधित आहेत. परंतु, महामार्गाच्या स्वच्छतेबाबत या दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.