शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

औरंगाबाद महामार्गावर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना ...

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना घाणीचेच दर्शन होत असून, यामुळे नगर शहराची प्रतिमा डागाळली जात आहे. याकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

नगर-औरंगाबाद महामार्ग नगर शहरातून जातो. शहरातील तपोवन रस्त्यापासून महापालिकेची हद्द सुरू होते. तपोवन रस्त्यापासून ते वसंत टेकडी या भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. झाडाझुडपांमध्ये मृत जनावरे टाकली जात आहेत. तसेच महामार्गावर व्यवसाय करणारे व्यावसायिकदेखील कचरा आणून टाकतात. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचराच-कचरा, अशी परिस्थिती आहे. महामार्गावर अतिक्रमणे आहेतच. त्यात आता भर पडली आहे ती कचऱ्याची. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तर दुर्लक्ष आहेत. परंतु हा परिसर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो. महापालिकेमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू आहे. शहरातील ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. परंतु महामार्गाकडे मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नगर-औरंगाबाद महामार्गावर पुणे ते औरंगाबाद या शहरातील वाहनांची ये-जा असते. या प्रवाशांना नगर शहरात प्रवेश करताच दुर्गंधीला सामोरे जावे लागते. नगर शहराची प्रतिमा यामुळे डागाळली जाते.

.....

महामार्गांच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची?

नगर शहरातून औरंगाबाद, पुणे, कल्याण, सोलापूर, मनमाड असे महामार्ग जातात. हे महामार्ग महापालिका हद्दीतून पुढे जातात. हे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असले तरी ते महापालिका हद्दीतून जातात. या दोन्ही यंत्रणा महामार्गाशी संबंधित आहेत. परंतु, महामार्गाच्या स्वच्छतेबाबत या दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.