शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महामार्गावर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना ...

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना घाणीचेच दर्शन होत असून, यामुळे नगर शहराची प्रतिमा डागाळली जात आहे. याकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

नगर-औरंगाबाद महामार्ग नगर शहरातून जातो. शहरातील तपोवन रस्त्यापासून महापालिकेची हद्द सुरू होते. तपोवन रस्त्यापासून ते वसंत टेकडी या भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. झाडाझुडपांमध्ये मृत जनावरे टाकली जात आहेत. तसेच महामार्गावर व्यवसाय करणारे व्यावसायिकदेखील कचरा आणून टाकतात. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचराच-कचरा, अशी परिस्थिती आहे. महामार्गावर अतिक्रमणे आहेतच. त्यात आता भर पडली आहे ती कचऱ्याची. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तर दुर्लक्ष आहेत. परंतु हा परिसर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो. महापालिकेमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू आहे. शहरातील ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. परंतु महामार्गाकडे मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नगर-औरंगाबाद महामार्गावर पुणे ते औरंगाबाद या शहरातील वाहनांची ये-जा असते. या प्रवाशांना नगर शहरात प्रवेश करताच दुर्गंधीला सामोरे जावे लागते. नगर शहराची प्रतिमा यामुळे डागाळली जाते.

.....

महामार्गांच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची?

नगर शहरातून औरंगाबाद, पुणे, कल्याण, सोलापूर, मनमाड असे महामार्ग जातात. हे महामार्ग महापालिका हद्दीतून पुढे जातात. हे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असले तरी ते महापालिका हद्दीतून जातात. या दोन्ही यंत्रणा महामार्गाशी संबंधित आहेत. परंतु, महामार्गाच्या स्वच्छतेबाबत या दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.