शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

औरंगाबाद महामार्गावर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना ...

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना घाणीचेच दर्शन होत असून, यामुळे नगर शहराची प्रतिमा डागाळली जात आहे. याकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

नगर-औरंगाबाद महामार्ग नगर शहरातून जातो. शहरातील तपोवन रस्त्यापासून महापालिकेची हद्द सुरू होते. तपोवन रस्त्यापासून ते वसंत टेकडी या भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. झाडाझुडपांमध्ये मृत जनावरे टाकली जात आहेत. तसेच महामार्गावर व्यवसाय करणारे व्यावसायिकदेखील कचरा आणून टाकतात. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचराच-कचरा, अशी परिस्थिती आहे. महामार्गावर अतिक्रमणे आहेतच. त्यात आता भर पडली आहे ती कचऱ्याची. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तर दुर्लक्ष आहेत. परंतु हा परिसर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो. महापालिकेमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू आहे. शहरातील ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. परंतु महामार्गाकडे मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नगर-औरंगाबाद महामार्गावर पुणे ते औरंगाबाद या शहरातील वाहनांची ये-जा असते. या प्रवाशांना नगर शहरात प्रवेश करताच दुर्गंधीला सामोरे जावे लागते. नगर शहराची प्रतिमा यामुळे डागाळली जाते.

.....

महामार्गांच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची?

नगर शहरातून औरंगाबाद, पुणे, कल्याण, सोलापूर, मनमाड असे महामार्ग जातात. हे महामार्ग महापालिका हद्दीतून पुढे जातात. हे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असले तरी ते महापालिका हद्दीतून जातात. या दोन्ही यंत्रणा महामार्गाशी संबंधित आहेत. परंतु, महामार्गाच्या स्वच्छतेबाबत या दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.