शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

आढळगाव आदर्शगाव करण्याचे स्वप्न गांधी यांच्या निधनाने अधुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST

आढळगाव : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने आढळगाव (ता.श्रीगोंदा) आदर्शग्राम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. २०१४ साली खासदार ...

आढळगाव : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने आढळगाव (ता.श्रीगोंदा) आदर्शग्राम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

२०१४ साली खासदार झाल्यानंतर आढळगाव ‘संसद सदस्य आदर्शग्राम’ योजनेत घेतल्याचे गांधींनी जाहीर केले होते. विकासकामे मार्गी लावण्यासाठी विशेष लक्ष दिले. अडीअडचणींमध्ये आधार असणाऱ्या गांधी यांच्या निधनाने कार्यकर्त्यांनी पोरके झाल्याची भावना व्यक्त करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

१९९९ साली प्रथम लोकसभेवर निवडून गेल्यापासून गांधी यांची आढळगाव परिसरातील गावांशी नाळ जोडली गेली. भाजपा किसान मोर्चाचे तात्कालीन अध्यक्ष बळीराम बोडखे, देवराव वाकडे, गंगाराम दरेकर, दत्तात्रय जामदार, राजेंद्र भोस यांच्यासह अनेक कार्यकर्ते गांधी यांनी जोडले. आढळगाव ते गव्हाणेवाडी हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गांधी यांच्या प्रयत्नातून साकार झाला. आजही उत्कृष्ट दर्जासाठी रस्ता प्रसिद्ध आहे.

२०१४ साली खासदार झाल्यानंतर आढळगाव ‘संसद सदस्य आदर्शग्राम’ योजनेत समावेश करण्याचे त्यांनी जाहीर केले. गावातील आवश्यक कामांचा आराखाडा तयार केला. परंतु, या योजनेतून निधी मिळाला नाही तसेच गावातील राजकीय साठमारींमुळे गाव या योजनेपासून वंचित राहिले. तरीही विकासकामे राबविण्यासाठी दिलीप गांधी यांचा पाठपुरावा कायम असायचा. गावठाणातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे त्यांचे स्वप्न होते.

राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याकडून त्यांनी दोन रस्ते काँक्रिटीकरण करून दिले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी हा नाव्हरा ते आढळगावपर्यंत करण्यासाठी गांधी आग्रही राहिले. २०१९ साली पक्षाने खासदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतरही आढळगावच्या विकासकामांसाठी त्यांचा पाठपुरावा कायम होता.