शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

खेळते भांडवल योजनेचा जिल्हा बँकेकडून खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST

अहमदनगर : कोणतेही कर्ज हे किमान वर्षभरासाठी असते. जिल्हा सहकारी बँकेने मात्र खेळते भांडवल योजनेतील कर्जाची सहा महिन्यांतच वसुली ...

अहमदनगर : कोणतेही कर्ज हे किमान वर्षभरासाठी असते. जिल्हा सहकारी बँकेने मात्र खेळते भांडवल योजनेतील कर्जाची सहा महिन्यांतच वसुली करण्याचा आदेश दिला आहे. यावर कळस असा की अनेक शेतकर्यांची कर्ज प्रकरणे अजून मंजूर झालेली नाहीत. यावरून जिल्हा सहकारी बँकेने खेळते भांडवल योजनेचा खेळ केला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी खेळते भांडवल योजना आणली. ही योजना ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत ३४ हजार सभासद शेतकऱ्यांना २४० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. हे कर्ज वाटप करून सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. काही तालुक्यांतील शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे अद्याप मंजूर झालेली नाहीत. असे असतानाच खेळते भांडवल योजनेंतर्गत वाटप केलेले कर्ज ३१ मार्चपर्यंत वसूल करण्याचा आदेश जिल्हा बँकेने विकास संस्थांना दिला आहे. सहा महिन्यांतच शेतकऱ्यांवर कर्ज परत करण्याची वेळ येणार आहे. त्यात डिसेंबर महिना चार दिवसांनी संपणार आहे. त्यामुळे जानेवारीत कर्ज मिळालेल्यांना तर तीन महिन्यांतच कर्ज परत करावे लागेल, असे सांगण्यात आले.

शासनाच्या कर्जमाफीमुळे जिल्हा सहकारी बँकेची तिजोरी भरली. सभासद शेतकरीही नवीन कर्जास पात्र ठरले. त्यामुळे बँकेकडून कर्ज वाटप करण्यात आले. चालू अर्थिक वर्षात बँकेने शेतकऱ्यांसाठी नवीन खेळते भांडवल योजना आणली. हे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विकास संस्थेत कागदपत्रांची पूर्तता केली; पण अनेकांचे कर्ज अद्याप मंजूर झालेले नाही. असे असताना वसुलीचे पत्र विकास संस्थेत धडकल्याने कर्ज वाटप करावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत विकास संस्था आहेत.

...

- कोरोनामुळे खेळते भांडवल योजना सुरू करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे लगेच कर्ज वसुली करता येणार नाही. हे कर्ज भरण्यास सभासद शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याबाबतच बैठकीत चर्चा केली जाईल.

- सीताराम गायकर, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक