शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भावी निमगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रचार निर्णायक टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST

दहिगाव : शेवगाव तालुक्यात ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार असून २ हजार ...

दहिगाव : शेवगाव तालुक्यात ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार असून २ हजार ४७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जगदंबा माता ग्रामविकास मंडळ आणि रेणुकामाता ग्रामविकास परिवर्तन मंडळ यांच्या प्रत्येकी ११ उमेदवारांसह पाच अपक्ष असे एकूण २७ उमेदवार ११ जागांसाठी निवडणूक लढवत आहेत.

सध्या मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर उभे आहे. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गुप्त बैठकांना वेग आला आहे. प्रचारात जगदंबा माता ग्रामविकास मंडळ त्यांनी केलेला विकास आणि पारदर्शी कारभार या मुद्यावर भर देताना दिसत आहे. रेणुकामाता ग्रामविकास परिवर्तन मंडळ सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित न होता सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे या परिवर्तनवादी मुद्यावर जोर देताना पाहायला मिळत आहे.

अपक्षांच्या रूपाने युवा चेहरे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काय होणार याचा अंदाज युवा वर्गापासून राजकारणातील जाणकार मंडळी घेत आहेत. चौकाचौकांतील चर्चेतही आता निवडणुकीचाच विषय रंगत आहे. आम्ही राजकारणासाठी नाही तर गाव विकासासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे मतदारांना सांगितले जात आहे.