शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात कोरोनाबाधित ४५ जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला असून, गुरुवारी दिवसभरात ४५ जणांवर ...

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला असून, गुरुवारी दिवसभरात ४५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पहाटेपर्यंत अंत्यविधी सुरू होते. वर्षभरातील सर्वाधिक मृत्यू एका दिवसात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात दररोज दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. मृतांच्या संख्येत आठवभरात अचानक वाढ झाली आहे. बुधवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा गुरुवारी एकदम वाढला. दिवसभरात अमरधामध्ये ४२ तर दफनभूमीमध्ये ३ आशा ४५ जणांवर अंत्यविधी करण्यात आला. अमरधाममध्ये कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन विद्युत दाहिन्या आहेत. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागतो. गुरुवारी दिवसभरात दोन विद्युत दाहिन्यांमध्ये २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या विद्युत दाहिन्या सायंकाळपर्यंत सुरू होत्या. मृतांचा आकडा मोठा असल्याने २२ मृतदेह ओट्यांवर ठेवून अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह अंत्यविधीसाठी दाखल झाल्याने अमरधाममधील यंत्रणेवरही ताण आला. अंत्यविधीवेळी नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत. त्यांनी दिवसभर अंत्यविधीचे काम केले. रात्री तर मृतदेह घेऊन येणाऱ्या शववाहिकांची रांगच लागली होती. त्यामुळे व्यवस्थापनाने ओट्यावर अंत्यविधी उरकले. रात्री दीड वाजेपर्यंत अंत्यविधीचे काम सुरू होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळी विद्युत दाहिन्या सुरू करण्यात आल्या. दुपारपर्यंत कोरोनामुळे दहाजणांचा मृत्यू झाला. सायंकाळी हा आकडा आणखी वाढेल, असे सांगण्यात आले.

....

एका शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूक

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात. एका मृतदेहावर अंत्यंसस्कार करण्यासाठी साधारपणे दीड तास लागतो. तोपर्यंत आणखी सहा मृतदेह आणून ठेवलेले असतात. त्यात खासगी रुग्णालयातील मृतांचा आकडाही मोठा आहे. खासगी रुग्णालयातील शववाहिकेतूनही मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथेच आणले जात असल्याने यंत्रणेचा गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे.

......

मनपाची नवीन शववाहिका अडकली लालफितीत

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गत एप्रिल महिन्यात एका दिवसात कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी एकाच शववाहिकेतून पाच ते सहा मृतदेहांची वाहतूक होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे मनपाने अन्य एक शववाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, वर्ष उलटूनही नवीन शववाहिका खरेदी केलेली नाही. त्यामुळे एकाच शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूक आजही सुरू असल्याचे दिसून आले.