शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

एका दिवसात कोरोनाबाधित ४५ जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला असून, गुरुवारी दिवसभरात ४५ जणांवर ...

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला असून, गुरुवारी दिवसभरात ४५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पहाटेपर्यंत अंत्यविधी सुरू होते. वर्षभरातील सर्वाधिक मृत्यू एका दिवसात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात दररोज दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. मृतांच्या संख्येत आठवभरात अचानक वाढ झाली आहे. बुधवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा गुरुवारी एकदम वाढला. दिवसभरात अमरधामध्ये ४२ तर दफनभूमीमध्ये ३ आशा ४५ जणांवर अंत्यविधी करण्यात आला. अमरधाममध्ये कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन विद्युत दाहिन्या आहेत. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागतो. गुरुवारी दिवसभरात दोन विद्युत दाहिन्यांमध्ये २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या विद्युत दाहिन्या सायंकाळपर्यंत सुरू होत्या. मृतांचा आकडा मोठा असल्याने २२ मृतदेह ओट्यांवर ठेवून अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह अंत्यविधीसाठी दाखल झाल्याने अमरधाममधील यंत्रणेवरही ताण आला. अंत्यविधीवेळी नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत. त्यांनी दिवसभर अंत्यविधीचे काम केले. रात्री तर मृतदेह घेऊन येणाऱ्या शववाहिकांची रांगच लागली होती. त्यामुळे व्यवस्थापनाने ओट्यावर अंत्यविधी उरकले. रात्री दीड वाजेपर्यंत अंत्यविधीचे काम सुरू होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळी विद्युत दाहिन्या सुरू करण्यात आल्या. दुपारपर्यंत कोरोनामुळे दहाजणांचा मृत्यू झाला. सायंकाळी हा आकडा आणखी वाढेल, असे सांगण्यात आले.

....

एका शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूक

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात. एका मृतदेहावर अंत्यंसस्कार करण्यासाठी साधारपणे दीड तास लागतो. तोपर्यंत आणखी सहा मृतदेह आणून ठेवलेले असतात. त्यात खासगी रुग्णालयातील मृतांचा आकडाही मोठा आहे. खासगी रुग्णालयातील शववाहिकेतूनही मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथेच आणले जात असल्याने यंत्रणेचा गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे.

......

मनपाची नवीन शववाहिका अडकली लालफितीत

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गत एप्रिल महिन्यात एका दिवसात कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी एकाच शववाहिकेतून पाच ते सहा मृतदेहांची वाहतूक होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे मनपाने अन्य एक शववाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, वर्ष उलटूनही नवीन शववाहिका खरेदी केलेली नाही. त्यामुळे एकाच शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूक आजही सुरू असल्याचे दिसून आले.