शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

यंदाही सुरू राहणार फळपीक विमा योजना

By admin | Updated: June 10, 2014 00:14 IST

बाभळेश्वर : हवामानावर आधारित फळपीक योजना मागील वर्षी शेतकऱ्यांना लाभदायक ठरल्याने यंदाच्या वर्षीही फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

बाभळेश्वर : हवामानावर आधारित फळपीक योजना मागील वर्षी शेतकऱ्यांना लाभदायक ठरल्याने यंदाच्या वर्षीही फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली़योजनेच्या पहिल्या टप्प्यात संत्री, मोसंबी आणि पेरू या तीन फळपिकांचा योजनेत समावेश असून २० जून २०१४ पर्यंत फळपीक उत्पादकांना या विमा योजनेत सहभागी होता येणार असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे म्हणाले की, बदलत्या हवामानाचा फळपिकांवर परिणाम होऊन मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते़ यावर उपाय म्हणून हवामानावर आधारित पीक विमा योजनेची सुरूवात शासनाने केली़ मागील वर्षी पथदर्शी स्वरूपात संत्री, मोसंबी, पेरूसह द्राक्ष, डाळिंब, आंबा, काजू या पिकांना प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली़ राज्यात मागील वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या फळबागांना या योजनेचा मोठा लाभ झाला असे, मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितले़इतर पिकांप्रमाणेच फळपीक विमा योजनेचाही उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होतो़ हे निदर्शनास आल्याने फळपीक योजना या वर्षीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की, कमी पाऊस, पावसातील अनियमितता, हवामानातील सापेक्ष आर्द्रता या हवामान घटकांपासून फळबागांना संरक्षण देतानाच फळबागायतदारांना दिलासा देण्यासाठी फळपीक योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही कृषी विभागामार्फत सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले़या वर्षी संत्री, मोसंबी, पेरू व संत्र्यासाठी प्रत्येकी सात जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला असल्याने फळबाग उत्पादकांना याचा लाभ होईल़ नगर जिल्हा हा फळपीक उत्पादनात आघाडीवर आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील फळबाग उत्पादकांना या विमा योजनेचा दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे विखे यांनी सांगितले़ (वार्ताहर)