शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

फ्रंटलाइन वर्करचा आरोग्य विमा ग्रामपंचायतीने उतरवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर सध्या अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक ...

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर सध्या अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा विमा उतरवावा, अशी मागणी भाजपचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचे जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे जोखमीचे काम अंगणवाडीसेविका (४६३९), मिनीअंगणवाडीसेविका (६४०), मदतनीस (४२५६), आशावर्कर (३१८२), आशा गटप्रवर्तक (१७०), आशा तालुका समूहसंघटक (१४), ग्रामपंचायत कर्मचारी (२७७४) असे मिळून १५६७५ कर्मचारी करत आहेत. हे सर्व कर्मचारी तुटपुंज्या पगारावर कार्यरत आहेत. कमी पगार असूनही केवळ कुटुंबप्रमुख म्हणून कौटुंबिक जबाबदारी असल्याने हे सर्व कार्यरत आहेत. कोरोना लागण झाल्यास साध्या औषधोपचाराचीही परिस्थिती यांची नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा उपचार खर्च हे कसे पेलतील? जिल्हा परिषदेच्या इतर अधिकारी किंवा कर्मचा-यांची आणि त्यांच्या कुटुंबाचीदेखील औषधोपचाराची जबाबदारी सरकार स्वीकारते. किंबहुना, त्यांना याबाबतचे पूर्ण संरक्षण सरकारकडून दिले जाते. परंतु वरील १५६७५ कर्मचाऱ्यांना असा कोणताही आधार नाही. त्यामुळे अशा सर्व कर्मचा-यांना संबंधित ग्रामपंचायतीकडून आरोग्य विम्याचे संरक्षण मिळाल्यास त्यांच्यासाठी मोठा आधार निर्माण होईल. संबंधित कर्मचाऱ्यांचा एक वर्षभराचा जरी ग्रामपंचायतीने आरोग्य विमा उतरविला, तरी फार खर्च येणार नाही. म्हणून आपण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या सर्व कर्मचाऱ्यांना विमासंरक्षण द्यावे म्हणून आदेश काढण्याची गरज आहे, असे वाकचौरे यांनी निवेदनात म्हटले आहे.