शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

फ्रंटलाइन वर्करचा आरोग्य विमा ग्रामपंचायतीने उतरवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर सध्या अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक ...

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर सध्या अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा विमा उतरवावा, अशी मागणी भाजपचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचे जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे जोखमीचे काम अंगणवाडीसेविका (४६३९), मिनीअंगणवाडीसेविका (६४०), मदतनीस (४२५६), आशावर्कर (३१८२), आशा गटप्रवर्तक (१७०), आशा तालुका समूहसंघटक (१४), ग्रामपंचायत कर्मचारी (२७७४) असे मिळून १५६७५ कर्मचारी करत आहेत. हे सर्व कर्मचारी तुटपुंज्या पगारावर कार्यरत आहेत. कमी पगार असूनही केवळ कुटुंबप्रमुख म्हणून कौटुंबिक जबाबदारी असल्याने हे सर्व कार्यरत आहेत. कोरोना लागण झाल्यास साध्या औषधोपचाराचीही परिस्थिती यांची नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा उपचार खर्च हे कसे पेलतील? जिल्हा परिषदेच्या इतर अधिकारी किंवा कर्मचा-यांची आणि त्यांच्या कुटुंबाचीदेखील औषधोपचाराची जबाबदारी सरकार स्वीकारते. किंबहुना, त्यांना याबाबतचे पूर्ण संरक्षण सरकारकडून दिले जाते. परंतु वरील १५६७५ कर्मचाऱ्यांना असा कोणताही आधार नाही. त्यामुळे अशा सर्व कर्मचा-यांना संबंधित ग्रामपंचायतीकडून आरोग्य विम्याचे संरक्षण मिळाल्यास त्यांच्यासाठी मोठा आधार निर्माण होईल. संबंधित कर्मचाऱ्यांचा एक वर्षभराचा जरी ग्रामपंचायतीने आरोग्य विमा उतरविला, तरी फार खर्च येणार नाही. म्हणून आपण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या सर्व कर्मचाऱ्यांना विमासंरक्षण द्यावे म्हणून आदेश काढण्याची गरज आहे, असे वाकचौरे यांनी निवेदनात म्हटले आहे.