शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

फ्रंटलाइन वर्करचा आरोग्य विमा ग्रामपंचायतीने उतरवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर सध्या अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक ...

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर सध्या अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा विमा उतरवावा, अशी मागणी भाजपचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचे जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे जोखमीचे काम अंगणवाडीसेविका (४६३९), मिनीअंगणवाडीसेविका (६४०), मदतनीस (४२५६), आशावर्कर (३१८२), आशा गटप्रवर्तक (१७०), आशा तालुका समूहसंघटक (१४), ग्रामपंचायत कर्मचारी (२७७४) असे मिळून १५६७५ कर्मचारी करत आहेत. हे सर्व कर्मचारी तुटपुंज्या पगारावर कार्यरत आहेत. कमी पगार असूनही केवळ कुटुंबप्रमुख म्हणून कौटुंबिक जबाबदारी असल्याने हे सर्व कार्यरत आहेत. कोरोना लागण झाल्यास साध्या औषधोपचाराचीही परिस्थिती यांची नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा उपचार खर्च हे कसे पेलतील? जिल्हा परिषदेच्या इतर अधिकारी किंवा कर्मचा-यांची आणि त्यांच्या कुटुंबाचीदेखील औषधोपचाराची जबाबदारी सरकार स्वीकारते. किंबहुना, त्यांना याबाबतचे पूर्ण संरक्षण सरकारकडून दिले जाते. परंतु वरील १५६७५ कर्मचाऱ्यांना असा कोणताही आधार नाही. त्यामुळे अशा सर्व कर्मचा-यांना संबंधित ग्रामपंचायतीकडून आरोग्य विम्याचे संरक्षण मिळाल्यास त्यांच्यासाठी मोठा आधार निर्माण होईल. संबंधित कर्मचाऱ्यांचा एक वर्षभराचा जरी ग्रामपंचायतीने आरोग्य विमा उतरविला, तरी फार खर्च येणार नाही. म्हणून आपण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या सर्व कर्मचाऱ्यांना विमासंरक्षण द्यावे म्हणून आदेश काढण्याची गरज आहे, असे वाकचौरे यांनी निवेदनात म्हटले आहे.