शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

भोसा खिंडीतून आवर्तनासाठी मोर्चा

By admin | Updated: May 28, 2014 00:15 IST

अहमदनगर : वारंवार मागणी करूनही कुकडी प्रकल्पाचे अधिकारी भोसा खिंडीतून सीना धरणात आवर्तन सोडत नसल्याने मंगळवारी (दि.२७) कर्जतच्या संतप्त शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

अहमदनगर : वारंवार मागणी करूनही कुकडी प्रकल्पाचे अधिकारी भोसा खिंडीतून सीना धरणात आवर्तन सोडत नसल्याने मंगळवारी (दि.२७) कर्जतच्या संतप्त शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दुष्काळ हटवण्यासाठी सरकारने या भागात सव्वाशे कोटी रूपये खर्च केले. मात्र,पाणी देण्याची तसदी घेतली नाही, असा या आंदोलकांचा आरोप आहे. मिरजगाव परिसरातील गुलाब तनपुरे, विजय पवार, संतोष जंजीरे, संपतराव बावडकर, दादासाहेब शेळके, उत्तम बनकर शंभरावर शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी संबंधित प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस नसल्याने ते कोरडे असते. या धरणात पाणी देण्यासाठी भोसा खिंड योजना करण्यात आली. मात्र, त्याचेही तब्बल १३ वर्षे काम चालले. या योजनेतून ओव्हरफ्लोचेही पाणी दिले जात नाही. या धरणातून अनेक गावांच्या पाणीयोजना आहेत. त्या पाण्याअभावी बंद असल्याने टँकरवर सरकारचा मोठा खर्च होतो. गेल्यावर्षी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी कुकडीतून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. तरीही पाणी सोडले नाही. तुकाई चारीचा सर्व्हेही केला नाही. हे काम तातडीने सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)