शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Updated: October 28, 2014 01:00 IST

पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाचा विविध संघटनांनी मोर्चा, गावबंद आदी आंदोलनांमधून निषेध नोंदविला़ तसेच या हत्याकांडाला आठवडा उलटला

पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाचा विविध संघटनांनी मोर्चा, गावबंद आदी आंदोलनांमधून निषेध नोंदविला़ तसेच या हत्याकांडाला आठवडा उलटला तरी आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले नाही़ त्यामुळे विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पाथर्डी शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ तेथे झालेल्या निषेध सभेत पोलिसांच्या तपासाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली़मिरी येथे निषेधपाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याच्या घटनेचा मिरी ग्रामपंचायतीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, आरोपींना अटक करुन कडक शिक्षा करण्याची मागणी सरपंच मिना मिरपगार यांनी केली आहे़ आठवडा उलटला तरी अद्याप या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही़ पोलिसांनी वेगाने तपास करुन आरोपींना अटक करावी, अशी मागणी सरपंच मिरपगार, उपसरपंच बाबासाहेब गवळी, रमेश मिरपगार, बंडोपंत झाडे, नारायण सोलाट, एकनाथ झाडे, आदीनाथ वाघ आदींनी केली आहे़श्रीगोंद्यात मोर्चाश्रीगोंदा : पाथर्डी तालुक्यातील दलित हत्याकांड प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा अन्यथा नवीन सरकारचा शपथविधी दिन काळा दिवस पाळण्याचा इशारा श्रीगोंद्यातील दलित नेत्यांनी दिला आहे. सोमवारी दलित बांधवांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध केला. जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबियांच्या नातेवाईकांना २५ लाखाची मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डी. एम. भालेराव, मल्हारराव घोडके, जालिंधर घोडके, टिळक भोस, सुरेश सुडगे, जीवा घोडके, सुनील घोडके यांची भाषणे झाली. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी राजेंद्र नागवडे, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब शेलार, केशव मगर, शहानुर अत्तार, प्रशांत दरेकर, दादा औटी, फक्कड मोटे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)