शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

उपोषणार्थी स्वातंत्र्यसैनिक रुग्णालयात

By admin | Updated: June 12, 2024 12:11 IST

नेवासा : नेवासा बुद्रुक व परिसरातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. नुकसान भरपाईपासून शेतकर्‍यांना

नेवासा : नेवासा बुद्रुक व परिसरातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. नुकसान भरपाईपासून शेतकर्‍यांना वंचित ठेवणार्‍या ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी सोमवारी (दि.१९) नेवासा शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणाचे नेतृत्त्व करणारे ९४ वर्षीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ६ च्या सुमारास प्रांताधिकारी, बीडीओ, तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने चर्चा निष्फळ ठरली. नेवासा बुद्रुक परिसरातील पंच्याहत्तर टक्के शेतकर्‍यांचे नुकसान होऊन ही संबंधीत अधिकार्‍यांनी पंचनामे न केल्याने शेतकरी वंचित राहिले. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नेवासा बुद्रुकसह परिसरातील शेतकर्‍यांनी सोमवारी (दि.१९) रोजी सकाळी उपोषणास प्रारंभ केला. तहसीलदार हेमा बडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन नागरिक व शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रांताधिकारी आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही असा ठाम निर्धार केला. उपोषणस्थळी जि. प. सदस्य दिलीप वाकचौरे, भाजपाचे जिल्हा चिटणीस अनिल ताके, शेतकरी संघटनेचे त्रिंबकराव भदगले यांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला. यामध्ये उपोषणाचे नेतृत्त्व करणारे ९४ वर्षीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक किसनराव जपे हे खुर्चीवरून खाली कोसळले. तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी एकच धावपळ उडाली. आता तरी उपोषणकर्ते उपोषण सोडतील अशी आशा असताना उपोषणकर्ते जागेवरून हालले देखील नाही. प्रांताधिकारी आल्याशिवाय व लेखी आश्वासनानंतरच आम्ही येथून उठू, असा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला. (तालुका प्रतिनिधी) हे आहेत उपोषणार्थी शेतकरी या उपोषणामध्ये बाळासाहेब जायगुडे, प्रभाकर जायगुडे, बाळासाहेब कोकणे, अ‍ॅड.सादिक शिलेदार, ज्ञानेश्वर जायगुडे, संभाजी पवार, बाळासाहेब जाधव, संजय मारकरी, प्रवीण जपे, ह.भ.प. कोंडिराम महाराज पेचे, डॉ.महेश हापसे, अनिल बोरकर, सुरेश डौले, भानुदास रेडे, किशोर गायकवाड, कृष्णा ठाणगे, अर्जुन ठाणगे, डॉ.यादव, ह.भ.प. लक्ष्मण शिंदे, केशव महाराज डौले, कचरू महाराज बोरूडे, निवृत्ती डौले, दादासाहेब गंडाळ, नवनाथ मारकळी, अनिल हापसे यांच्यासह नेवासा बुद्रूक, साईनाथनगर, लेकुरवाळी आखाडा येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. उपोषणार्थींशी चर्चा निष्फळ झाल्याने ते मंडपात बसून होते. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रांतधकिारी राजेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी उपोषणकर्ते अ‍ॅड.सादिक शिलेदार, बाळासाहेब जायगुडे, बाळासाहेब कोकणे, दादासाहेब गंडाळ, संभाजी पवार, डॉ. महेश हापसे यांच्याशी चर्चा केली. शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांसमवेत गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांसंदर्भात चर्चा ही वस्तुस्थिती मांडून केली. मात्र याबाबत जिल्हाधिकार्‍यांना विचारून निर्णय घ्यावा लागेल, असे प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितल्याने उपोषणकर्त्यांशी चर्चा निष्फळ ठरली. सर्व अधिकार्‍यांनी आम्ही जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून सांगतो म्हणून ते तहसील कार्यालयात निघून गेले. यावेळी कॉ.बाबा आरगडे, जानकीराम डौले, दिलीपराव मोटे, दिलीप सरोदे, गफुरभाई बागवान, पी.आर. जाधव यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.