शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गरजू लोकांसाठी धान्य आणि किराणा सामानाचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST

लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या गोरगरिबांसमोर पोट भरण्याची चिंता आणि उदरभरणाचे संकट निर्माण झाले होते. अशा ...

लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या गोरगरिबांसमोर पोट भरण्याची चिंता आणि उदरभरणाचे संकट निर्माण झाले होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक आणि सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कोल्हार-भगवतीपूर गावातील आपल्या गोरगरीब समाजबांधवांना दिलासा देण्यासाठी मंडळाच्या तरुणांनी लोकवर्गणीतून संकलित झालेला निधी,गावातील व्यक्तींनी दिलेली रोख रक्कम तसेच जीवनावश्यक वस्तू स्वरूपातील असे एकूण सुमारे ७० हजार रुपयांची रक्कम जमा केली. या रकमेतून खरेदी केलेल्या धान्य आणि तांदूळ, साखर, तेल, डाळ, मसाले अशा जीवनावश्यक किराणा वस्तूंचे या मंडळाच्या तरुणांनी वाटप केले. गावात स्वच्छतादूत म्हणून सेवा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तसेच कोरोना योद्धा असणाऱ्या आशा सेविकांना या मंडळाची ही मदत लाख मोलाची ठरली. नियमांचे पालन करून घरोघर जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या सामग्रीचे वाटप या मंडळाने केले. महाशिवरात्र महोत्सव मंडळाचे अक्षय रवींद्र मोरे, वैभव कोळपकर, अक्षय वादे, दिगंबर दळवी, यश जोशी, आयुष मोरे, मंगेश वादे, आदित्य चव्हाण यांनी सामाजिक दायित्वातून राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

200521\img-20210520-wa0064.jpg

गरजू लोकांसाठी धान्य आणि किराणा सामानाचे मोफत वाटप करताना कोल्हार-भगवतीपूर येथील महाशिवरात्र महोत्सव मंडळाचे तरूण कार्येकर्ते