शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या फसव्या घोषणांनी जनता भरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 23:59 IST

शिर्डी : जनता फसव्या घोषणांमुळे भरडली जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली

शिर्डी : जेवढ्या चुका काँग्रेसने पंधरा वर्षात केल्या तेवढ्या चुका मोदी व फडणवीस सरकारने दोन वर्षात केल्या असूनही जनता त्यांच्या फसव्या घोषणांमुळे भरडली जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. भाजप-सेना सत्तेसाठी खोटं-नाटं बोलतात व पैसा कमवतात त्यातून सत्ता मिळवतात. या दोघांचे खरे रूप जनतेला कळले असून गरिबांसाठी अच्छे दिन कधीच येणार नाहीत, असेही ते म्हणाले़ शनिवारपासून सुरू असलेल्या महिला कॉँग्रेस प्रशिक्षण शिबिराचा समारोप राणे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा होत्या़ यावेळी महाराष्ट्र प्रभारी नेटा डिसुझा, निलम राणे, अ‍ॅड. चारूलता टोकस, शालिनीताई विखे, दुर्गाताई तांबे, अंजली टापरे, विनायक देशमुख, सत्यजित तांबे, कांचन मांढरे, सरला पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़राज्य व केंद्रातील भाजपाचे सरकार मागील काँग्रेस सरकारच्या योजना नावे बदलून चालवत असल्याचे सांगत अच्छे दिन येणार नाहीत. आदेशाची वाट पाहू नका, महिलांनी सक्रिय व्हा, काँग्रेसची कामे गावागावात पोहचवा, येणाऱ्या स्थानिक निवडणुकांत आपली ताकद दाखवून द्या, केवळ सरकारवर टीका करून सत्ता मिळवण्याचे स्वप्न न पाहता कामाला लागण्याचा सल्ला राणे यांनी यावेळी दिला़ कुठल्याही पक्षाच्या नेत्याने आदेश देताना परिणामांचा विचार करावा, विधायक, सामाजिक कामांनी लोकप्रिय होता येते़ मराठी माणसाचं हित कोणी किती केलं, हे मुंबईच्या मराठी माणसाला माहीत आहे, असे म्हणत नाव न घेता राणे यांनी राज ठाकरे यांच्या रिक्षा जाळण्याच्या आदेशावर टीका केली. (तालुका प्रतिनिधी) संघाला ‘अच्छे दिन’आरएसएसने आता हाफऐवजी फुल पँट वापरण्याचा निर्णय घेतलाय, याचा अर्थ आरएसएसचे अच्छे दिन सुरू झालेत. मात्र गोरगरीब जनता आजही होरपळत आहे. पंतप्रधान गरीबाचे असल्याचे वाटतच नाही. आजही कुपोषण, शिक्षणाचे प्रश्न असताना मोदी मात्र अकरा लाखाचा सूट वापरतायत, अशी टीकाही नारायण राणेंनी केली.यावेळी शोभा ओझा यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्या असहिष्णुतेच्या वक्तव्यावर तोफ डागली. कॉँग्रेस जर असहिष्णु असती तर अनुपम खेर यांच्या वक्तव्यानंतर आतापर्यंत त्यांचे हातपाय तुटले असते. कॉँग्रेस महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवर चालते, नथुराम गोडसेच्या नाही. कॉँग्रेसमध्ये त्यागाची परंपरा आहे. खोट्या व्हिडीओ क्लिप बनवून विद्यार्थ्यांना जेलमध्ये टाकणे किंवा दलिताला आत्महत्येस परावृत्त करणे, असे कॉँग्रेस कधीच करत नाही, अशी टीका यावेळी ओझा यांनी भाजपावर केली.