शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

चौदा जणांना सश्रम कारावास

By admin | Updated: October 19, 2016 01:02 IST

कर्जत : सामायिक रस्त्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणप्रकरणी मंगळवारी कर्जत न्यायालयाने चौदा जणांना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

कर्जत : सामायिक रस्त्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणप्रकरणी मंगळवारी कर्जत न्यायालयाने चौदा जणांना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २०११ मध्ये कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथे घडली होती. ११ जानेवारी २०११ रोजी सायंकाळी बाभूळगाव शिवारातील शेतातील येण्या-जाण्याच्या सामायिक रस्त्यावरून उसाचा भरलेला ट्रॅक्टर जाऊ न दिल्यामुळे दोन्ही गटांत वाद झाला होता. यावेळी आपापसांत गज, कोयता, चैन, काठ्या यासारख्या घातक हत्यारांनी मारहाण केली होती. यात दोन्ही गटांच्या लोकांना कमी-अधिक प्रमाणात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या होत्या. या खटल्याची सुनावणी कर्जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर झाली. फिर्यादी, जखमी, साक्षीदार, डॉक्टर, तपासाधिकारी यांचे जबाब ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अविनाश माळवदे यांनी आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील चौदा जणांना प्रत्येकी एकूण दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)आरोपींची नावेसाहेबराव पुराणे, गंगाधर पुराणे, सीताराम पुराणे, पंकज पुराणे, सुभाष पुराणे, तुषार पुराणे, राजेंद्र पुराणे, नामदेव पुराणे, सुनील पुराणे, संदीप पुराणे, गणेश पुराणे, सतीश पुराणे, नितीन पुराणे,छाया पुराणे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सहकारी वकील अ‍ॅड. गहिनीनाथ नेवसे यांनी काम पाहिले.