शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बालविवाह प्रकरणी अखेर चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST

शेवगाव : अखेर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात शून्य नंबरने त्या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल ...

शेवगाव : अखेर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात शून्य नंबरने त्या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची आई, मामा, आजी यांच्यासह नवरदेवावर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा चकलंबा (जि. बीड) पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

या प्रकरणी नगर येथील चाईल्ड लाईन संस्था व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. फिर्यादीत म्हटले आहे की, पतीला सोडून पत्नी तीन मुलींसह एक मुलगा यांना घेऊन सध्या शिक्रापूर (जि. पुणे) येथे मुलाबाळांसमवेत राहते. तिचा पती हिंगेवाडी (जि. शेवगाव) येथे त्याच्या वडिलांसमवेत राहतो. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केशव ऊर्फ सोमनाथ पांडुरंग भवर याच्यासोबत पत्नी मुलीचे लग्न लावून देणार असल्याचे पतीला व्हॉट्सॲपवरील लग्नपत्रिकेवरून समजले. लग्नपत्रिकेत १८ ऑगस्टला कुढेकरवस्ती बोधेगाव येथे विवाहस्थळ असल्याचे त्यात नमूद होते. त्यानंतर पतीने चाईल्ड लाईनला संपर्क करून अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेवगाव पोलिसांनी कळविल्यानंतर १६ ऑगस्टला बोधेगाव बीटचे पोलीस अंमलदार, ग्रामसेवक यांनी, लग्नपत्रिकेतील पत्त्यावर जाऊन खात्री केली आहे. मात्र, त्यांच्या घराला कुलूप होते. बालविवाह होत असल्याबाबत पोलिसांना समजल्याची कुणकुण लागताच संबंधित लोक तिथून कुठेतरी निघून गेले. त्यानंतर मुलीचा बालविवाह केशव ऊर्फ सोमनाथ पांडुरंग भवर याच्यासोबत नियोजित ठिकाणी न करता गायकवाडी जळगाव (चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड) येथील अंध-अपंगांची शाळा येथे झाला आहे. मुलीचा जाणीवपूर्वक बालविवाह लावून देण्यास पत्नी रंजना, मेहुणा बबलू विष्णू मोरे, सासू विजूबाई मोरे, केशव ऊर्फ सोमनाथ पांडुरंग भवर हेच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चौघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार शेवगाव पोलीस ठाण्यात शून्य नंबरने गुन्हा दाखल केला.

----

कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. ही गंभीर बाब आहे. ग्रामीण स्तरावरील यंत्रणांपासून तर जिल्हास्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी अशा बालविवाह लावणाऱ्या व्यक्तींवर त्वरित कठोर कारवाई केली तर हे बालविवाह थांबू शकतात. यासाठी सजग नागरिकांनी बालविवाह होत असल्याबाबतची माहिती चाईल्ड लाईन संस्थेला वेळेवर सांगावी.

-हनिफ शेख,

अध्यक्ष, बाल कल्याण समिती, अहमदनगर