शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री भारस्कर यांचे निधन

By admin | Updated: May 2, 2016 23:28 IST

अहमदनगर : राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री व नगरचे सुपुत्र बाबुराव नामदेव भारस्कर (वय ८६) यांचे रविवारी (दि़ १) निधन झाले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : जुन्या आठवणींना उजाळाअहमदनगर : राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री व नगरचे सुपुत्र बाबुराव नामदेव भारस्कर (वय ८६) यांचे रविवारी (दि़ १) निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी येथील अमरधाम येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते़ भारस्कर यांची अंत्ययात्रा सोमवारी दुपारी टिळकरोड येथील त्यांच्या शामा चंद्रमुखी या निवासस्थानातून निघाली. अमरधाम येथील शोकसभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते, तहसीलदार सुधीर पाटील, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त माधव वाघ, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. यावेळी माजी आमदार दादा कळमकर, लहू कानडे, पोपट साठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारस्कर यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९३० मध्ये झाला. त्यांचे शिक्षण शेवगाव व नंतर नगर आणि पुण्यात झाले. विद्यार्थीदशेतच ते १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभागी झाले. १९५२ मधे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते श्रीगोंदा-कर्जत या राखीव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. यानंतर १९५७, १९६२, १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते याच मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. १९६७ मध्ये त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ भारस्कर यांनी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोग आदी संस्थांवर त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले़ त्यांनी काही काळ जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले़ बाळासाहेब भारदे, रावसाहेब पटवर्धन या जिल्ह्यातील नेत्यांना ते आदर्श मानीत. त्यांच्या अंत्यविधीस जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या पिढीतील अनेक नामवंत, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. शांत, संयमी तसेच सर्वसामान्य लोकांच्या कामाबाबत सदैव तत्पर असणाऱ्या भारस्कर यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.(प्रतिनिधी)बाबुराव भारस्कर यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने समाजात लोकप्रियता मिळवली होती. विकासापासून वंचित राहिलेल्या घटकांचे प्रतीनिधीत्व करतांना विकासाच्या मुख्य प्रवाहात या समाज घटकाला आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. समाजकल्याण विभागाचे मंत्रिपद भूषविताना त्यांनी नाही रे वर्गाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. मातंग समाज आर्थिक उन्नती विकास महामंडळाची निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. कॉँग्रेस पक्षाच्या सर्व संघटनात्मक कार्यात भारस्कर यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. त्यांच्या कार्याचा अनुभव लक्षात घेऊन विविध निवडणुकांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. विखे कुटुंबीय आणि त्यांचा असलेला ऋणानुबंध राजकारणापलिकडचा होता. -राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते