शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

छावणी परिषदांसाठी दिल्लीत पाठपुरावा करू

By admin | Updated: July 26, 2016 23:50 IST

\भिंगार : देशातील ६२ छावणी परिषदांमध्ये अनेक समस्या असून, या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही़ या परिषदांमधील समस्या मार्गी लावण्यासाठी

\भिंगार : देशातील ६२ छावणी परिषदांमध्ये अनेक समस्या असून, या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही़ या परिषदांमधील समस्या मार्गी लावण्यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा करणार आहे़ मागण्यांची दखल घेतली नाही तर परिषदा बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे अखिल भारतीय छावणी परिषदेचे उपाध्यक्ष व सदस्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीवकुमार गुप्ता यांनी सांगितले़ गुप्ता यांनी मंगळवारी छावणी परिषदेला भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सदस्यांशी चर्चा केली़ यावेळी त्यांनी प्रश्न समजावून घेत दिल्ली दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच परिषदेच्या दुय्यम अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यांसंदर्भात संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता, त्यास यश आले असून बदल्यांचा अध्यादेश लवकरच निघणार आहे, असे त्यांनी सांगितले़ ‘स्मार्ट सिटी’सारख्या योजना देशात राबवल्या जात आहेत. सर्व शहरे झपाट्याने विकसित होत आहेत़ देशातील बहुतांश छावणी परिषदा मात्र, विकासकामांत मागे आहेत. ब्रिटिशांनी अंमलात आणलेल्या कायद्याच्या धर्तीवर छावण्यांचा कारभार सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाच्या योजनांचा लाभ येथे मिळत नाही़ मूलभूत सुविधांअभावी अहमदनगरसारख्या छावणी परिषदा विकासात मागे राहिल्या आहेत. छावणी परिषद कायद्यात बदल होणार नसतील तर उपाध्यक्ष व सदस्यांचे देशपातळीवर अधिवेशन बोलावून सर्व छावणी परिषदा बरखास्त कराव्यात, अशी मागणी करण्यात येईल, असे सांगत गुप्ता म्हणाले, छावणी परिषदेचा उपाध्यक्ष हा जनतेतून निवडावा, ही मागणी आम्ही उचलून धरली आहे. त्यामुळे कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींना संधी मिळेल. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष मुसाद्दिक सय्यद, रवी लालबोंद्रे, बाळासाहेब पतके, सदस्या शुभांगी साठे, गणेश साठे व सुरेश मेहतानी आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)