शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

साई नगरात पेटली राष्ट्रभक्तीची ज्योत, साईनगरीतील पहिला प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:33 IST

केवळ धार्मिकतेचा प्रचार प्रसार न करता साईभक्तांच्या ह्वदयात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचे कार्यही संस्थानच्या माध्यमातुन करण्यात येते असे़ पहिल्या प्रजासत्ताक दिनी साईसंस्थानने गावातून रथ मिरवणूक काढून

प्रमोद आहेरशिर्डी (अहमदनगर): केवळ धार्मिकतेचा प्रचार प्रसार न करता साईभक्तांच्या ह्वदयात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचे कार्यही संस्थानच्या माध्यमातुन करण्यात येते असे़ पहिल्या प्रजासत्ताक दिनी साईसंस्थानने गावातून रथ मिरवणूक काढून व कर्मचा-यांना भोजन देऊन आनंद साजरा केला होता़२६ जानेवारी १९५०, गुरूवार रोजी पहिल्या प्रजासत्ताक दिनाला शिर्डीत समाधी मंदीराजवळ ध्वजारोहन समारंभ करण्यात आला़ या आनंदप्रित्यर्थ संस्थानच्या सर्व नोकरांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ पहिल्या प्रजासत्ताक दिनापर्यंत शिर्डीत वीज आली नव्हती त्यामुळे तेलाचे दिवे लावून रोषणाई करण्यात आली़विशेष म्हणजे अती विशिष्ठ सणांना व दिवशीच बाबांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात येते़ मात्र या परंपरा बाजुला ठेवत प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक क्षणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पहिल्या प्रजासत्ताक दिनी गावातून बाबांच्या प्रतिमेची रथातुन मिरवणुक काढण्यात आली होती़ रात्री कोपरगावचे गजानन विश्वनाथ जोशी व कोपरगावकर भजनमंडळींचे संगीत भजन झाले़ पंडीत जगन्नाथबुवा सुरतकर, व्यासबुवा वेशीकर, सोलापुरचे रामकृष्णबुवा सोमण, दिगंबरबुवा, माधवराव खलेकर, रामदास नायडु वगैरे सोलापुरच्या भाविकांनी गायन, वादन, फिडल, तबला, हार्मोनियमची तर दामुबाण्णा बेलापुरकर यांनी सनईवादन करून समाधी समोर हजेरी दिली़शिर्डीत वीज पोहचण्यापुर्वी संस्थानने वीज निर्मितीसाठी लेंडीबागेजवळ डिझेल इंजिनावर चालणारे पॉवर हाऊस निर्माण केले़ यामुळे गणेश चतुर्थी ५ सप्टेंबर १९५१ च्या आसपास शिर्डीत पहिला दिवा लागला़ यानंतर उत्सवाबरोबरच राष्ट्रीय सणांच्या दिवशी मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात येई़१९६१ च्या प्रजासत्ताक दिनी सकाळी कळसानजीक गच्चीवर ध्वजारोहण करण्यात आले़ या निमीत्ताने समाधी व मंदीरावर वीजेच्या रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली़ या दिवशी ग्वाल्हेरचे महाराजांच्या देणगीतुन संस्थान नोकर, गावातील पुढारी, शिक्षक यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले़ रात्री दोन वाजेपर्यंत विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरे करण्यात आले़पहिले ध्वजारोहन मंदीरालगत झाले असले तरी नंतर मात्र समाधी मंदीरावर ध्वजारोहन सोहळा होत असे़ त्यावेळी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात येई़ त्यानंतर १९८२ च्या आसपास हा कार्यक्रम लेंडीबागेत, जुन्या साईनिवास इमारती समोर होवु लागला़ जागा अपुरी पडु लागल्यानंतर १९९९ पासुन ध्वजारोहन नवीन भक्त निवास, पाचशे रूमच्या मागे, कार्यकारी अधिकारी बंगल्याच्या समोरील मैदानावर होवु लागला़