शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीतून जायकवाडीला गेले पाच टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : यंदा नाशिक धरण समूहात पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच कमी राहिले. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : यंदा नाशिक धरण समूहात पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच कमी राहिले. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमीच राहिल्याने गोदावरी नदीतून पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत जायकवाडी धरणात २३ ऑगस्ट अखेर ५ टीएमसी पाणी गेले आहे. याउलट गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये सुमारे १९ टीएमसी जायकवाडीला गेले होते. प्राप्त परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून टळलेले समन्यायी पाणी वाटपाचे संकट पुन्हा डोके वर काढून नगर जिल्ह्यातील कालव्यांच्या आवर्तनांना कात्री तर बसणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.

यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून सर्वत्र कमी पाऊस राहिला. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील धरण समूहात देखील जाणवला. त्यामुळे नांदूर मद्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीत कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरीतून जायकवाडी धरणात आत्तापर्यंत पाच टीएमसी पाणी वाहून गेले आहे. दोन वर्षापासून पर्जन्यमान चांगले राहिल्याने जायकवाडीला मुबलक पाणी जात होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमीच राहिल्याने पुन्हा नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष पेटतो की काय? अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच तालुक्यात पुन्हा एकदा उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढले आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातही पाऊस कमीच आहे. विहरी, कूपनलिका यांची पाणी पातळी खालावली आहे.

..................

समन्यायी कायद्यामुळे कायमच संघर्ष !

२००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मागील काही वर्ष दुष्काळ राहिल्याने नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा असा नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यावरून कायम संघर्ष पेटत राहिला. प्रसंगी या संघर्षातून तीनही जिल्ह्यातील नेत्यांची, शेतकऱ्यांची अनेक आंदोलने झाली. न्यायालयीन लढाया देखील झाल्या. मात्र, कायदाच समन्यायी असल्याने या लढाईत मराठवाड्याकडे कायम विजयश्री राहिली. या समन्यायीच्या लढाईत नाशिक - नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पाणी जायकवाडीला जात होते. तसतसे कालव्यांचे आवर्तन कमी होत होते. कमी झालेल्या आवर्तनामुळे या लाभक्षेत्रातील शेती उद्ध्वस्त होऊ लागली.

.............

जायकवाडीत ४१ टक्के पाणी

जायकवाडी धरण १५ ऑक्टोबर अखेर ६५ टक्के भरलेले असल्यास समन्यायी पाणी वाटपाचा तिढा सुटलेला असतो. यंदा मात्र, पाऊस कमी असल्याने धरण ४१ टक्केच भरलेले आहे. त्यामुळे १५ तारखेपर्यंत धरण ६५ टक्के भरले नाहीच तर समन्यायीचे भूत वर डोके काढू शकते.

.........

२३ ऑगस्ट अखेर धरण व टक्केवारी

दारणा : ८८.८२

गंगापूर : ९०.१२

कडवा : ९०.५२

भोजापूर : २०.७८

वालदेवी : १००

मुकणे : ५८.१७

कश्यपी :६२.५३

गौतमी-गोदावरी : ७१.७९

आळंदी : १००

भाहुली : १००

वाकी : ५१.२८