शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘पूर्णवाद’ लावणार पाच हजार झाडे

By admin | Updated: July 11, 2016 00:57 IST

अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यातून झाडे मागविण्यात आली आहेत. याच दिवशी वृक्षदिंडी, वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी शिष्य परिवाराला यंदा झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीने झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. याच अ‍ॅकॅडमीने दोन महिन्यापूर्वी पारनेरला पर्यावरण परिषद आयोजित केली होती. गुरुपौर्णिमा ही वृक्षपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील पूर्णवाद परिवारातील दोन हजार तरुण पारनेरमध्ये झाडे लावण्यासाठी दाखल होणार आहेत. पूर्णवाद परिवाराच्या सर्व मंदिरांमध्येही गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाडे लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रमुख सोहळा १९ जुलै रोजी पारनेरमध्ये होणार असल्याची माहिती अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष राहुल संत यांनी दिली. १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पारनेर पब्लिक स्कूलमध्ये सूर्यनमस्कार, योगासन मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळी माजी सैनिक दथरथ बोरुडे, गीताराम म्हस्के, अ‍ॅड. अमित देशपांडे उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास उढाण, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, प्राचार्य एच. पी. गोडळकर यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात येईल. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत म्हस्के, महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर, विवेक देशपांडे, लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या वृक्षारोपण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन गौरव पुरंदरे, सुरेंद्र रोडगे, स्वप्नील जहागीरदार, गणेश संत, मंगेश मोहिते आदींनी केले आहे.पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, दुष्काळ आणि पाण्याची घटलेली जलपातळी या पार्श्वभूमीवर राज्यभरात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पारनेर तालुक्यात वर्षभरात ११ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यातील पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन १९ जुलै रोजी करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या ‘माय सिटी-माय ट्री’अभियानामुळे झाडे लावण्याबाबत जागृती वाढली आहे.-अ‍ॅड. राहुल संत, आयोजक