शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

‘पूर्णवाद’ लावणार पाच हजार झाडे

By admin | Updated: July 11, 2016 00:57 IST

अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यातून झाडे मागविण्यात आली आहेत. याच दिवशी वृक्षदिंडी, वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी शिष्य परिवाराला यंदा झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीने झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. याच अ‍ॅकॅडमीने दोन महिन्यापूर्वी पारनेरला पर्यावरण परिषद आयोजित केली होती. गुरुपौर्णिमा ही वृक्षपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील पूर्णवाद परिवारातील दोन हजार तरुण पारनेरमध्ये झाडे लावण्यासाठी दाखल होणार आहेत. पूर्णवाद परिवाराच्या सर्व मंदिरांमध्येही गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाडे लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रमुख सोहळा १९ जुलै रोजी पारनेरमध्ये होणार असल्याची माहिती अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष राहुल संत यांनी दिली. १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पारनेर पब्लिक स्कूलमध्ये सूर्यनमस्कार, योगासन मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळी माजी सैनिक दथरथ बोरुडे, गीताराम म्हस्के, अ‍ॅड. अमित देशपांडे उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास उढाण, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, प्राचार्य एच. पी. गोडळकर यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात येईल. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत म्हस्के, महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर, विवेक देशपांडे, लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या वृक्षारोपण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन गौरव पुरंदरे, सुरेंद्र रोडगे, स्वप्नील जहागीरदार, गणेश संत, मंगेश मोहिते आदींनी केले आहे.पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, दुष्काळ आणि पाण्याची घटलेली जलपातळी या पार्श्वभूमीवर राज्यभरात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पारनेर तालुक्यात वर्षभरात ११ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यातील पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन १९ जुलै रोजी करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या ‘माय सिटी-माय ट्री’अभियानामुळे झाडे लावण्याबाबत जागृती वाढली आहे.-अ‍ॅड. राहुल संत, आयोजक