शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच बँकांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:29 IST

आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना टाळे लागले आहे. तर एका बँकेचे विलिनीकरण झाले आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना टाळे लागले आहे. तर एका बँकेचे विलिनीकरण झाले आहे. बंद पडून टाळे लागलेल्या बँकांचे कर्जदारांकडे ८५ कोटी रूपये थकले असून ठेवीदारांचे अंदाजे ७० कोटी रूपये अडकून पडले आहेत.राहुरी फॅक्टरी येथील अभिनव सहकारी बँक, राहुरी येथील राहुरी पीपल्स बँक, जामखेड मर्चंट बँक, संगमनेर येथील बी. जे. खताळ जनता सहकारी बँक व कोपरगाव येथील बाळासाहेब सातभाई मर्चंटस् बँक या अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना गेल्या दहा वर्षांमध्ये टाळे लागले आहे. आर्थिक गैरव्यवहारांमुळे दिवाळे निघालेल्या या बँकांवर अवसायक, प्रशासकाच्या नेमणुका केलेल्या आहेत.अभिनव सहकारी बँक ७ फेब्रुवारी २०१३ रोजी अवसायानात काढली. तेव्हा ६ कोटी १४ लाख १३ हजार रूपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या होत्या. तर ३ कोटी ८१ लाख ३२ हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. कर्जाची रक्कम सहकार आयुक्तांच्या ६ मार्च २०१७ च्या आदेशानुसार बँकेने एन.पी.ए. ची रक्कम भरणा करून कर्ज थकबाकी शून्यावर आणली.जामखेड मर्चंट बँक १ जून २०१६ रोजी अवसायानात काढल्यानंतर ६ कोटी ७३ लाख १५ हजार रूपये कर्ज थकबाकी होती. व्याज रखडल्यामुळे ३१ मे २०१८ अखेर ही रक्कम ६ कोटी ९० लाख ५९ हजार रूपयांवर पोहोचली आहे. तर ठेवीदारांच्या अडकून पडलेल्या ठेवींचा व्याजासह आकडा ९ कोटी ४१ लाख ७२ रूपयांवर गेला आहे. बाळासाहेब सातभाई बँक अवसायानात निघाल्यानंतर ४१ कोटी ८० लाख १८ हजार कर्ज थकबाकी थकलेली होती. तर ठेवीदारांच्या १२ कोटी १३ लाख ६५ हजार रूपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या होत्या. राहुरी पीपल्स बँक ९ मार्च २०१० रोजी अवसायानात निघाली. त्या दिवशी या बँकेची २१ कोटी ५ लाख १३ हजार ९८० कर्ज थकबाकी होती. तर १३ हजार ८७४ ठेवीदारांच्या २० कोटी ४ लाख ८६ हजार ३९४ रूपयांच्या ठेवी अडकल्या. खताळ बँकेची ३० जून २०१८ अखेर ८ कोटी ९८ लाख ३० हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. तर ठेवीदारांच्या १ कोटी ९६ लाख ६९ हजार रूपयांच्या ठेवी देणे होत्या. खताळ बँकेची ३० जून २०१८ अखेर ८ कोटी ९८ लाख ३० हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. तर ठेवीदारांच्या १ कोटी ९६ लाख ६९ हजार रूपयांच्या ठेवी देणे होत्या.या पाचही बँकांवर सहकार खात्याने प्रशासक,अवसायकाच्या नेमणुका केलेल्या आहेत. ठेवीदारांच्या अडकलेल्या कोट्यवधींच्या ठेवी परत देण्यासाठी कर्जदारांकडून कर्ज वसुली करणे तसेच दोषी संचालकांविरूद्ध कारवाई करून त्यांच्या व पतसंस्थेच्या मालमत्तांचा लिलाव करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. -दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था),अहमदनगर.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district bankनगर जिल्हा सहकारी बँक