शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच बँकांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:29 IST

आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना टाळे लागले आहे. तर एका बँकेचे विलिनीकरण झाले आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना टाळे लागले आहे. तर एका बँकेचे विलिनीकरण झाले आहे. बंद पडून टाळे लागलेल्या बँकांचे कर्जदारांकडे ८५ कोटी रूपये थकले असून ठेवीदारांचे अंदाजे ७० कोटी रूपये अडकून पडले आहेत.राहुरी फॅक्टरी येथील अभिनव सहकारी बँक, राहुरी येथील राहुरी पीपल्स बँक, जामखेड मर्चंट बँक, संगमनेर येथील बी. जे. खताळ जनता सहकारी बँक व कोपरगाव येथील बाळासाहेब सातभाई मर्चंटस् बँक या अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना गेल्या दहा वर्षांमध्ये टाळे लागले आहे. आर्थिक गैरव्यवहारांमुळे दिवाळे निघालेल्या या बँकांवर अवसायक, प्रशासकाच्या नेमणुका केलेल्या आहेत.अभिनव सहकारी बँक ७ फेब्रुवारी २०१३ रोजी अवसायानात काढली. तेव्हा ६ कोटी १४ लाख १३ हजार रूपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या होत्या. तर ३ कोटी ८१ लाख ३२ हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. कर्जाची रक्कम सहकार आयुक्तांच्या ६ मार्च २०१७ च्या आदेशानुसार बँकेने एन.पी.ए. ची रक्कम भरणा करून कर्ज थकबाकी शून्यावर आणली.जामखेड मर्चंट बँक १ जून २०१६ रोजी अवसायानात काढल्यानंतर ६ कोटी ७३ लाख १५ हजार रूपये कर्ज थकबाकी होती. व्याज रखडल्यामुळे ३१ मे २०१८ अखेर ही रक्कम ६ कोटी ९० लाख ५९ हजार रूपयांवर पोहोचली आहे. तर ठेवीदारांच्या अडकून पडलेल्या ठेवींचा व्याजासह आकडा ९ कोटी ४१ लाख ७२ रूपयांवर गेला आहे. बाळासाहेब सातभाई बँक अवसायानात निघाल्यानंतर ४१ कोटी ८० लाख १८ हजार कर्ज थकबाकी थकलेली होती. तर ठेवीदारांच्या १२ कोटी १३ लाख ६५ हजार रूपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या होत्या. राहुरी पीपल्स बँक ९ मार्च २०१० रोजी अवसायानात निघाली. त्या दिवशी या बँकेची २१ कोटी ५ लाख १३ हजार ९८० कर्ज थकबाकी होती. तर १३ हजार ८७४ ठेवीदारांच्या २० कोटी ४ लाख ८६ हजार ३९४ रूपयांच्या ठेवी अडकल्या. खताळ बँकेची ३० जून २०१८ अखेर ८ कोटी ९८ लाख ३० हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. तर ठेवीदारांच्या १ कोटी ९६ लाख ६९ हजार रूपयांच्या ठेवी देणे होत्या. खताळ बँकेची ३० जून २०१८ अखेर ८ कोटी ९८ लाख ३० हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. तर ठेवीदारांच्या १ कोटी ९६ लाख ६९ हजार रूपयांच्या ठेवी देणे होत्या.या पाचही बँकांवर सहकार खात्याने प्रशासक,अवसायकाच्या नेमणुका केलेल्या आहेत. ठेवीदारांच्या अडकलेल्या कोट्यवधींच्या ठेवी परत देण्यासाठी कर्जदारांकडून कर्ज वसुली करणे तसेच दोषी संचालकांविरूद्ध कारवाई करून त्यांच्या व पतसंस्थेच्या मालमत्तांचा लिलाव करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. -दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था),अहमदनगर.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district bankनगर जिल्हा सहकारी बँक