शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिरजगावमधील मत्स्यबीज केंद्र २० वर्षांपासून कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 11:27 IST

राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे.

विनायक चव्हाणमिरजगाव : राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे.सीना धरण हे तालुक्यातील एकमेव धरण आहे. त्याच्या पायथ्याशी आठ एकरावरील या केंद्राच्या माध्यमातून या भागातील शेतकरी, मत्स्य व्यावसायिकांना फायदा होण्याची अपेक्षा असताना अधिकारी हे केंद्र कागदावरच चालवित आहेत. सध्या हा परिसर वेड्या बाभळीत हरवला आहे. या ठिकाणी आठ ते दहा मत्स्यबीज तलाव होते. या जमिनीवर काहीच होत नसल्याने सध्या मूळ शेतजमीन मालकांनी या जमिनी कसण्यास सुरूवात केली आहे. तसेच आमच्या जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणीही जमीन मालकांनी केली आहे.२००३-२००४ चा अपवाद सोडल्यास या केंद्रासाठी पाण्याची कमतरता कधीच नव्हती. भोसे खिंडीतून कुकडीचे पाणी सीना धरणात आल्यापासून धरणात व केंद्राच्या विहिरीत मुबलक पाणी आहे. गेल्या वीस वर्षांपासून हे केंद्र कार्यान्वित करण्याबाबत संबंधितांची उदासीनता आहे. हे केंद्र सुरू झाल्यास मत्स्यबीजास परिसरातून मोठी मागणी होऊ शकते. तालुक्यातील माशांची मोठी बाजारपेठ आहे. मत्स्य व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात मत्स्य संगोपनासाठी तलाव भाडे तत्त्वावर घेतात. या तळ्यात मत्स्यबीज सोडण्यासाठी भिगवण, करमाळा, पुणे, संगमनेर, मुळा धरण येथून मत्स्यबीज आणतात.परंतु व्यावसायिकांना हे परवडत नाही. यामध्ये जादा पैसे व वेळ वाया जातो. या व्यवसायातून कर्जत तालुक्यात लाखो रूपयांची उलाढाल होऊन अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. या केंद्रामुळे व्यवसाय वृद्धीसोबतच तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली असती. हे केंद्र सुरू करण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.या केंद्राच्या निर्मितीपासून नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी जूनमध्ये सेवानिवृत झाला. एक चौकीदार कर्मचारी आजही हे केंद्र सुरू नसल्यामुळे येथे एकटाच काळ्या पाण्याची सजा भोगत आहे. या ठिकाणच्या इमारतीचे फक्त अवशेष बाकी आहे.धरणात कायमस्वरूपी पाणी नसल्याने, मत्स्यबीज संवर्धन तलावात नैसर्गिक पाणी मिळत नाही. विहिरीतून पाणी उचलून टाकल्यास ते पाणी पाझरून जाते. विजेचाही प्रश्न उपस्थित होत होता. केंद्र उभारताना अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्याने हे केंद्र यशस्वी झाले नाही. -नागनाथ भादुले, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, अहमदनगर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयKarjatकर्जत