शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

शाळेची वाजणार आज पहिली घंटा!

By admin | Updated: June 16, 2014 00:11 IST

अहमदनगर : सोमवारपासून (दि.१६) प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.

अहमदनगर : सोमवारपासून (दि.१६) प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गात ५८ हजार १६३ विद्यार्थी प्रवेश करणार असून यात ३१ हजार ४१९ मुले तर २६ हजार ७४४ मुलींचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्याची तयारी शिक्षण विभागाने केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पहिल्याच दिवसापासून शिक्षक आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या पाहता गतवर्षी पासून शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि पालकांच्या स्वागताची पध्दत सुरू केली आहे. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना हक्काचे प्राथमिक शिक्षण बंधनकारक केले असून, त्यासाठी या वयोगटातील शंभर टक्के मुले शाळेत यावेत, यासाठी सहा जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता- पालक संघ, युवक मंडळे, महिला मंडळे, सेवाभावी संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळा स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर असंख्य प्रश्न आहेत. पहिल्याच दिवशी मोफत पाठ्य पुस्तके, गणवेश मिळतो की नाही, अनेक ठिकाणी वादळात शाळांचे नुकसान झालेले असल्याने बसायचे कुठे आदी विषय आहेत. दुसरीकडे शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार रखडले असून पदोन्नती, नव्याने पाचवी, आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून स्पष्ट सूचना नसल्याने गोंधळाची परिस्थिती आहे. यंदा प्राथमिक शिक्षकांच्या सुट्या टेन्शनमध्ये गेल्या. बदल्या होणार की नाहीत या चिंतेत शिक्षक असताना पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. आॅनलाईन पगाराच्या नावाखाली दोन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार रखडलेले आहेत. यामुळे शिक्षक बँकेने २ नंबरचे कर्ज नाकारलेले आहे. यामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नव्याने पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शनिवार (दि.१४) याबाबत अद्यापही कोणतेच स्पष्ट आदेश शिक्षकांना देण्यात आलेले नाहीत. यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दीड महिन्यापासून पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. यामुळे नवीन वर्गांना शिक्षक कोठून मिळणार. प्रशासन शिक्षकांना आधार देणार नसेल तर खासगी शाळांसोबत जिल्हा परिषद शाळा कशी स्पर्धा करणार. -संजय कळमकर, शिक्षक नेते.नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीचे वर्ग गुगल मॅपिंगद्वारे करण्यात येणार आहेत. संबंधित शिक्षकांनी सरळ गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात सर्व पुस्तके पोहचलेले आहे. गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीकडे पाठविण्यात आलेले आहेत.-दिलीप गोविंद, शिक्षणाधिकारी. शिक्षण विभागात पदोन्नती देताना पद्वीधर शिक्षकांना द्यावी की, बीएड् धारकांना द्यावी याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यात येणार आहे. सडा, रांगोळी, आंब्याचे तोरण बांधून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी रविवारी दिवसभर जिल्ह्यात भेट दिली.