शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शाळेची वाजणार आज पहिली घंटा!

By admin | Updated: June 16, 2014 00:11 IST

अहमदनगर : सोमवारपासून (दि.१६) प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.

अहमदनगर : सोमवारपासून (दि.१६) प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गात ५८ हजार १६३ विद्यार्थी प्रवेश करणार असून यात ३१ हजार ४१९ मुले तर २६ हजार ७४४ मुलींचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्याची तयारी शिक्षण विभागाने केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पहिल्याच दिवसापासून शिक्षक आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या पाहता गतवर्षी पासून शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि पालकांच्या स्वागताची पध्दत सुरू केली आहे. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना हक्काचे प्राथमिक शिक्षण बंधनकारक केले असून, त्यासाठी या वयोगटातील शंभर टक्के मुले शाळेत यावेत, यासाठी सहा जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता- पालक संघ, युवक मंडळे, महिला मंडळे, सेवाभावी संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळा स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर असंख्य प्रश्न आहेत. पहिल्याच दिवशी मोफत पाठ्य पुस्तके, गणवेश मिळतो की नाही, अनेक ठिकाणी वादळात शाळांचे नुकसान झालेले असल्याने बसायचे कुठे आदी विषय आहेत. दुसरीकडे शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार रखडले असून पदोन्नती, नव्याने पाचवी, आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून स्पष्ट सूचना नसल्याने गोंधळाची परिस्थिती आहे. यंदा प्राथमिक शिक्षकांच्या सुट्या टेन्शनमध्ये गेल्या. बदल्या होणार की नाहीत या चिंतेत शिक्षक असताना पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. आॅनलाईन पगाराच्या नावाखाली दोन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार रखडलेले आहेत. यामुळे शिक्षक बँकेने २ नंबरचे कर्ज नाकारलेले आहे. यामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नव्याने पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शनिवार (दि.१४) याबाबत अद्यापही कोणतेच स्पष्ट आदेश शिक्षकांना देण्यात आलेले नाहीत. यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दीड महिन्यापासून पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. यामुळे नवीन वर्गांना शिक्षक कोठून मिळणार. प्रशासन शिक्षकांना आधार देणार नसेल तर खासगी शाळांसोबत जिल्हा परिषद शाळा कशी स्पर्धा करणार. -संजय कळमकर, शिक्षक नेते.नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीचे वर्ग गुगल मॅपिंगद्वारे करण्यात येणार आहेत. संबंधित शिक्षकांनी सरळ गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात सर्व पुस्तके पोहचलेले आहे. गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीकडे पाठविण्यात आलेले आहेत.-दिलीप गोविंद, शिक्षणाधिकारी. शिक्षण विभागात पदोन्नती देताना पद्वीधर शिक्षकांना द्यावी की, बीएड् धारकांना द्यावी याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यात येणार आहे. सडा, रांगोळी, आंब्याचे तोरण बांधून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी रविवारी दिवसभर जिल्ह्यात भेट दिली.