शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून ११ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST

अहमदनगर : जिल्ह्यात मास्क वापरला नाही, अशा दहा हजार व्यक्तींवर प्रशासनाने कारवाई केली आहे. अशांकडून तब्बल ११ लाख रुपयांचा ...

अहमदनगर : जिल्ह्यात मास्क वापरला नाही, अशा दहा हजार व्यक्तींवर प्रशासनाने कारवाई केली आहे. अशांकडून तब्बल ११ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली. २० फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत मास्क न वापरणाऱ्या १० हजारांहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये ११ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मागील महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या. रात्री अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी केली. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे, आदींबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले. याशिवाय, गर्दी टाळण्याचेही आवाहन केले. नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महानगरपालिकांना निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यात नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत तालुका आणि गावपातळीवरील सर्व यंत्रणेला निर्देश दिले आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संबंधितांना दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना वचक बसावा यासाठी दंडाची रक्कम आता शंभर रुपयांवरून पाचशे रुपये इतकी करण्यात आली आहे.

----------

दंडात्मक वसुली १३ लाख

२० फेब्रुवारी ते ३ मार्च २०२१ या कालावधीत लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणे अशा ९५७ ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९१ ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करून २ लाख ४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मास्क न वापरणाऱ्या १० हजार १५० जणांकडून ११ लाख ३६ हजार ७०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.