शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

११ हजार मतदारांची भर

By admin | Updated: October 4, 2024 14:47 IST

अहमदनगर: विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी १० हजार ८५० नवीन मतदारांनी नोंदणी केली

अहमदनगर: विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी १० हजार ८५० नवीन मतदारांनी नोंदणी केली असून, सर्वाधिक मतदार नोंदणी नगर शहरात झाली़ जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३२ लाख १५ हजार २०३ झाली असून, पुरवणी मतदार यादी लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे़विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शनिवारपासून सुरुवात होत आहे़ त्यामुळे मतदार नोंदणीसाठी बुधवारी अखेरचा दिवस होता़ शहरासह जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली़ अखेरच्या दिवशी शहरासह जिल्ह्यात १० हजार ८५० मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती निवडणूक शाखेन दिली आहे़ जिल्हा निवडणूक शाखेच्या आहवालानुसार नगर शहरात सर्वाधिक १ हजार ६५० मतदार नोंदणी झाली आहे़ तर राहाता तालुक्यात सर्वात कमी २७१ मतदार नोंदणी झाली आहे़विशेष मोहिमेत झालेल्या मतदार नोंदणीमुळे मतदारांची संख्या ३२ लाख १५ हजार २०३ झाली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ कारण काही मतदान केंद्रावरील नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले नाहीत़ हे अर्ज येत्या एक- दोन दिवसांत प्राप्त होतील, असे जिल्ह निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले़निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ मतदारांची आकडे जुळवाजुळवी सुरू झाली असून, मतदार याद्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्या आहेत़ मतदारयादींवरून निवडणुकीचा अंदाज बांधला जात आहे़त्यात नव्याने ११ हजार मतदारांची भर पडली आहे़ पुरवणी यादी मतदारयादी लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे़नव्याने मतदार नोंदणी मोहिमेस कार्यकर्त्यांनीही हातभार लावला़ त्यामुळे ही मतदार नोंदणी झाली असून, काही मतदारसंघाने हजारांचा आकडा पार केला आहे़ तर काही मतदारसंघात ५०० मतदारांची नोंदणी होऊ शकलेली नाही़ अखेरची संधी असूनही नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याने अपेक्षेपेक्षा कमीच मतदार नोंदणी झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)