शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

राज्यपालांनी हस्तक्षेप करुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : संभाजी ब्रिगेडची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:09 IST

मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडसह अनेक मराठा संघटनांनी संघर्ष केलेला आहे.

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. प्रवरासंगम येथील पुलाचे आम्ही ‘काकासाहेब शिंदे पूल’ असे नामकरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘पंढरपूरला मराठा आंदोलक हे वारीत साप सोडणार होते. त्यामुळे आपण पंढरपूरला गेलो नाही,’ असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. हे वक्तव्य चिथावणीखोर आहे. मुख्यमंत्र्यांना असा गोपनीय अहवाल कोणत्या पोलीस अधिकाºयाने दिला ? की त्यांनी स्वत:च हा अहवाल तयार केला? याचा खुलासा त्यांनी राज्यासमोर करावा. वारकरी हे शेतकरी आहेत. त्यांना त्रास होईल अशी कृती कधीही मराठा बांधव करणार नाहीत. तरीदेखील फडणवीस यांनी जाणीवपूर्वक असे भडकावू वक्तव्य केले. साप सोडणे ही बहुजन समाजाची संस्कृती नाही. राष्टÑीय स्वयंसेवक संघात ही विकृती आहे. संघाचे कार्यकर्तेच वारीत घातपात घडविणार होते अशी आमची माहिती आहे. त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पंढरपूरच्या सुरक्षेवर लक्ष ठेऊन होतो.फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राज्यात हिंसाचार उफाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक करावी. राज्यपालांनी हस्तक्षेप करुन त्यांचा राजीनामा घ्यावा. उद्या खासदार, आमदार यांच्या घरांवर आंदोलनकर्ते चालून गेले तर आणखी परिस्थिती चिघळेल. मराठा समाजाच्या आमदार, खासदार यांनीही पदांचे राजीनामे देऊन समाजासोबत यावे अशी मागणीही आखरे यांनी केली. पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष संतोष गाजरे, संभाजी ब्रिगेडचे नेते राजेश परकाळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष संगीता चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळुंज, जिल्हा सचिव राजेंद्र राऊत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे, वीर भगतसिंग परिषदेचे अध्यक्ष शुभम काकडे, अच्युत गाडे,  गणेश गायकवाड यांची उपस्थिती होती.त्या पुलाला ‘काकासाहेब शिंदे’ यांचे नाव देणार कानडगाव (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथील ज्या गोदावरीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली. त्या पुलाचे नामकरण ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल’ असे करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आखरे यांनी जाहीर केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा