शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

राज्यपालांनी हस्तक्षेप करुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : संभाजी ब्रिगेडची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:09 IST

मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडसह अनेक मराठा संघटनांनी संघर्ष केलेला आहे.

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. प्रवरासंगम येथील पुलाचे आम्ही ‘काकासाहेब शिंदे पूल’ असे नामकरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘पंढरपूरला मराठा आंदोलक हे वारीत साप सोडणार होते. त्यामुळे आपण पंढरपूरला गेलो नाही,’ असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. हे वक्तव्य चिथावणीखोर आहे. मुख्यमंत्र्यांना असा गोपनीय अहवाल कोणत्या पोलीस अधिकाºयाने दिला ? की त्यांनी स्वत:च हा अहवाल तयार केला? याचा खुलासा त्यांनी राज्यासमोर करावा. वारकरी हे शेतकरी आहेत. त्यांना त्रास होईल अशी कृती कधीही मराठा बांधव करणार नाहीत. तरीदेखील फडणवीस यांनी जाणीवपूर्वक असे भडकावू वक्तव्य केले. साप सोडणे ही बहुजन समाजाची संस्कृती नाही. राष्टÑीय स्वयंसेवक संघात ही विकृती आहे. संघाचे कार्यकर्तेच वारीत घातपात घडविणार होते अशी आमची माहिती आहे. त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पंढरपूरच्या सुरक्षेवर लक्ष ठेऊन होतो.फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राज्यात हिंसाचार उफाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक करावी. राज्यपालांनी हस्तक्षेप करुन त्यांचा राजीनामा घ्यावा. उद्या खासदार, आमदार यांच्या घरांवर आंदोलनकर्ते चालून गेले तर आणखी परिस्थिती चिघळेल. मराठा समाजाच्या आमदार, खासदार यांनीही पदांचे राजीनामे देऊन समाजासोबत यावे अशी मागणीही आखरे यांनी केली. पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष संतोष गाजरे, संभाजी ब्रिगेडचे नेते राजेश परकाळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष संगीता चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळुंज, जिल्हा सचिव राजेंद्र राऊत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे, वीर भगतसिंग परिषदेचे अध्यक्ष शुभम काकडे, अच्युत गाडे,  गणेश गायकवाड यांची उपस्थिती होती.त्या पुलाला ‘काकासाहेब शिंदे’ यांचे नाव देणार कानडगाव (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथील ज्या गोदावरीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली. त्या पुलाचे नामकरण ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल’ असे करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आखरे यांनी जाहीर केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा