शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दिवसभर दगडांशी झुंज; रात्री पाण्याची भ्रांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:37 IST

दिवसभर उन्हातान्हात दगडांशी जीवघेणी झुंज द्यायची. रात्री पुन्हा पिण्याच्या पाण्याची भ्रांत. पिण्याच्या पाण्याचा टॅँकर येतो १५ दिवसांनी.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : दिवसभर उन्हातान्हात दगडांशी जीवघेणी झुंज द्यायची. रात्री पुन्हा पिण्याच्या पाण्याची भ्रांत. पिण्याच्या पाण्याचा टॅँकर येतो १५ दिवसांनी. ते पाणीही गाळ मिश्रित. इतरवेळी टिपाडभर पाण्यासाठी मोजावे लागतात ६० रूपये. अशा विविध प्रश्नांचा सामना करणाऱ्या मांडवगण येथील वडारवाडी, गोसावीवाडी (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामस्थांकडे प्रशासन, राजकीय पदाधिकारी कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे वडारवाडीतील कष्टकरी कुटुंब मेटाकुटीस आली आहेत.श्रीगोंदा-मांडवगण रस्त्यावरील माळरानावरील वडार, गोसावीवाडीची लोकसंख्या जवळपास ५०० आहे. येथील सर्व पुरुष, महिला दगड, धोंडे फोडून उदारनिर्वाह करतात. त्यातील अनेकांना गुंठाभरही जमीन नाही. ज्यांना जमीन आहे, त्यांच्या जमिनीत काही पिकत नाही. वडारवाडीतील पुरुषांबरोबरच महिलांनाही दररोज किमान शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावर जाऊन दगड फोडावे लागतात. विशेषत: रस्त्यावरील कामावर हे लोक मोठ्या संख्येने असतात. श्रमाचा मोबदला म्हणून प्रतिदिन २५० ते ३०० रूपये रोजंदारी मिळते. दिवसभर दगड फोडून आल्यानंतर रात्री पुन्हा पाण्याची भ्रांत असते. पंधरा दिवसातून एकदा शासकीय टॅँकर येतो. त्यातून जे मिळेल ते पाणी साठवायचे. तेही अनेकदा गाळमिश्रित असते. याशिवाय इतर खासगी टॅँकर येतात. ते ६० रूपयांमध्ये टिपाडभर पाणी देतात. असेच पाणी विकत घ्यावे लागते, असे येथील ग्रामस्थ सांगतात.मांडवगण ग्रामपंचायतीने वडार व गोसावीवाडी नळपाणी योजना केली. नवीन योजनेचे उद्घाटन दिमाखात झाले. मात्र पाईपमधून थेंबभरही पाणी आले नाही. जुन्या योजनेच्या विहिरीचा ताबा काही बड्या मंडळींनी घेतला आहे. त्यांच्या विरोधात बोलणार कोण? अशी अवस्थाआहे.येथे एक हातपंप आहे. त्याचीही पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे अनेकदा पाणी मिळतच नाही. शासनाच्या टॅँकरचे पाणी येते. ते पाणी जनावरेही पित नाहीत. आम्हाला बºयाचदा तेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे अनेक जण आजारी पडतात. -उज्ज्वला विठ्ठल जाधव, वडारवाडी,

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर