शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

दिवसभर दगडांशी झुंज; रात्री पाण्याची भ्रांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:37 IST

दिवसभर उन्हातान्हात दगडांशी जीवघेणी झुंज द्यायची. रात्री पुन्हा पिण्याच्या पाण्याची भ्रांत. पिण्याच्या पाण्याचा टॅँकर येतो १५ दिवसांनी.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : दिवसभर उन्हातान्हात दगडांशी जीवघेणी झुंज द्यायची. रात्री पुन्हा पिण्याच्या पाण्याची भ्रांत. पिण्याच्या पाण्याचा टॅँकर येतो १५ दिवसांनी. ते पाणीही गाळ मिश्रित. इतरवेळी टिपाडभर पाण्यासाठी मोजावे लागतात ६० रूपये. अशा विविध प्रश्नांचा सामना करणाऱ्या मांडवगण येथील वडारवाडी, गोसावीवाडी (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामस्थांकडे प्रशासन, राजकीय पदाधिकारी कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे वडारवाडीतील कष्टकरी कुटुंब मेटाकुटीस आली आहेत.श्रीगोंदा-मांडवगण रस्त्यावरील माळरानावरील वडार, गोसावीवाडीची लोकसंख्या जवळपास ५०० आहे. येथील सर्व पुरुष, महिला दगड, धोंडे फोडून उदारनिर्वाह करतात. त्यातील अनेकांना गुंठाभरही जमीन नाही. ज्यांना जमीन आहे, त्यांच्या जमिनीत काही पिकत नाही. वडारवाडीतील पुरुषांबरोबरच महिलांनाही दररोज किमान शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावर जाऊन दगड फोडावे लागतात. विशेषत: रस्त्यावरील कामावर हे लोक मोठ्या संख्येने असतात. श्रमाचा मोबदला म्हणून प्रतिदिन २५० ते ३०० रूपये रोजंदारी मिळते. दिवसभर दगड फोडून आल्यानंतर रात्री पुन्हा पाण्याची भ्रांत असते. पंधरा दिवसातून एकदा शासकीय टॅँकर येतो. त्यातून जे मिळेल ते पाणी साठवायचे. तेही अनेकदा गाळमिश्रित असते. याशिवाय इतर खासगी टॅँकर येतात. ते ६० रूपयांमध्ये टिपाडभर पाणी देतात. असेच पाणी विकत घ्यावे लागते, असे येथील ग्रामस्थ सांगतात.मांडवगण ग्रामपंचायतीने वडार व गोसावीवाडी नळपाणी योजना केली. नवीन योजनेचे उद्घाटन दिमाखात झाले. मात्र पाईपमधून थेंबभरही पाणी आले नाही. जुन्या योजनेच्या विहिरीचा ताबा काही बड्या मंडळींनी घेतला आहे. त्यांच्या विरोधात बोलणार कोण? अशी अवस्थाआहे.येथे एक हातपंप आहे. त्याचीही पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे अनेकदा पाणी मिळतच नाही. शासनाच्या टॅँकरचे पाणी येते. ते पाणी जनावरेही पित नाहीत. आम्हाला बºयाचदा तेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे अनेक जण आजारी पडतात. -उज्ज्वला विठ्ठल जाधव, वडारवाडी,

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर