शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

हक्काच्या पाण्यासाठी लढा सुरूच राहणार

By admin | Updated: September 23, 2014 23:02 IST

बाभळेश्वर : हक्काच्या पाण्यासाठी लढाई सुरूच ठेवावी लागेल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

बाभळेश्वर : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची केलेली शिफारस ही शेतकरी, उद्योग, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या हितविरोधी असून, या निर्णयाचा नगर जिल्हातील शेतीसह उद्योगक्षेत्रावरही मोठा परिणाम होईल. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी लढाई सुरूच ठेवावी लागेल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी समन्यायी पाणी वाटप धोरणामुळे धरणातून पाणी सोडण्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळेस या निर्णयाच्या विरोधात नगर जिल्हातून सर्वात प्रथम आपण विरोध केला. तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व राहाता नगरपालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून या निर्णयाला शेतकरी, उद्योग, व्यापारी व सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण विरोध केला. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणापुढे वेळोवेळी भूमिका स्पष्ट करून, ही लढाई सुरू ठेवली असतानाच, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने आता पुन्हा जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची केलेली शिफारस ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांबरोबरच सर्वच क्षेत्रांना उद्ध्वस्त करणारी आहे.भंडारदरा, निळवंडे धरणे भरल्याने ओव्हफ्लोचे पाणी जायकवाडीकडे जात आहे. शेजारील मुळा धरणातही सध्या २५ हजार टीएमसी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याकडे लक्ष वेधून विखे म्हणाले, मुळातच मेंढेगिरी समितीला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. मागील दोन वर्षे दुष्काळाच्या संकटात सापटलेल्या नगर जिल्ह्याला यंदा कुठेतरी उशीरा झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असतानाच, पाणी सोडण्याच्या या निर्णयामुळे हक्काच्या पाण्यावर गदा येणार आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन प्राधान्याने हक्काच्या पाण्यासाठी कायदेशीर लढाई सुरूच ठेवावी लागेल, असे विखे यांनी सांगितले. (वार्ताहर)