शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगार त्रिपक्ष समितीची पाचवी बैठकही निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST

भेंडा : राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपून दोन वर्षांचा कालावधी लोटला. वीस महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्रिपक्ष समितीची स्थापना झाली. ...

भेंडा : राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपून दोन वर्षांचा कालावधी लोटला. वीस महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्रिपक्ष समितीची स्थापना झाली. चार महिन्यांत समितीच्या पाच बैठका झाल्या. परंतु, वेतनवाढीसंदर्भात कोणताचा निर्णय न झाल्याने साखर कामगारांत सरकारबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे.

साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार ३१ मार्च २०१९ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर तब्बल २० महिन्यांनी साखर कामगारांच्या वेतनवाढ व सेवाशर्ती ठरविणाऱ्या त्रिपक्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या तीन बैठका मुंबईत, तर दोन बैठका पुणे येथे झाल्या. साखर कामगार संघटनांनी ४० टक्के वेतन वाढीची मागणी केली; परंतु आतापर्यंत झालेल्या बैठकीत कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. त्रिपक्ष समितीच्या निर्णयाकडे राज्यातील दोन लाख कामगारांचे लक्ष लागले होते; परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली.

राज्यात १८७ साखर कारखाने आहेत. पैकी ९५ सहकारी, तर ९२ खासगी साखर कारखाने आहेत. पूर्वी सहकारी तत्त्वावर आधारित असणारा साखर उद्योग आता खासगी होत चालला आहे. राज्याचे राजकारण व अर्थकारण साखर उद्योगाभोवती फिरते. साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची १० ते १२ वर्षे रोजंदारी व शिकाऊ कामगार यात जातात. नंतर तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते. बऱ्याच कारखान्यांनी चार ते पाच महिन्यांचे पगार थकविले आहेत. यामुळे साखर कारखान्यांकडे कुशल प्रशिक्षित कामगारांनी पाठ फिरविली.

---

कारखान्यांबाबतच्या अभ्यासक्रमांना विद्यार्थीही मिळेना..

नवीन पिढीतील तरुण साखर कारखान्यांत काम करायला तयार नाहीत.

याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील शुगर टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थीही मिळत नाहीत. त्यामुळे हा अभ्यासक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पुण्यातील वसंतदादा साखर संस्थेच्या अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. सध्या साखर कारखानदारीत काम करत असलेल्या उमेदवारांनाच संस्था प्रशिक्षण देते. राज्यातून त्यांना नवीन विद्यार्थीही मिळत नाहीत.