शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

साखर कामगार त्रिपक्ष समितीची पाचवी बैठकही निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST

भेंडा : राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपून दोन वर्षांचा कालावधी लोटला. वीस महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्रिपक्ष समितीची स्थापना झाली. ...

भेंडा : राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपून दोन वर्षांचा कालावधी लोटला. वीस महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्रिपक्ष समितीची स्थापना झाली. चार महिन्यांत समितीच्या पाच बैठका झाल्या. परंतु, वेतनवाढीसंदर्भात कोणताचा निर्णय न झाल्याने साखर कामगारांत सरकारबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे.

साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार ३१ मार्च २०१९ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर तब्बल २० महिन्यांनी साखर कामगारांच्या वेतनवाढ व सेवाशर्ती ठरविणाऱ्या त्रिपक्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या तीन बैठका मुंबईत, तर दोन बैठका पुणे येथे झाल्या. साखर कामगार संघटनांनी ४० टक्के वेतन वाढीची मागणी केली; परंतु आतापर्यंत झालेल्या बैठकीत कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. त्रिपक्ष समितीच्या निर्णयाकडे राज्यातील दोन लाख कामगारांचे लक्ष लागले होते; परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली.

राज्यात १८७ साखर कारखाने आहेत. पैकी ९५ सहकारी, तर ९२ खासगी साखर कारखाने आहेत. पूर्वी सहकारी तत्त्वावर आधारित असणारा साखर उद्योग आता खासगी होत चालला आहे. राज्याचे राजकारण व अर्थकारण साखर उद्योगाभोवती फिरते. साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची १० ते १२ वर्षे रोजंदारी व शिकाऊ कामगार यात जातात. नंतर तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते. बऱ्याच कारखान्यांनी चार ते पाच महिन्यांचे पगार थकविले आहेत. यामुळे साखर कारखान्यांकडे कुशल प्रशिक्षित कामगारांनी पाठ फिरविली.

---

कारखान्यांबाबतच्या अभ्यासक्रमांना विद्यार्थीही मिळेना..

नवीन पिढीतील तरुण साखर कारखान्यांत काम करायला तयार नाहीत.

याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील शुगर टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थीही मिळत नाहीत. त्यामुळे हा अभ्यासक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पुण्यातील वसंतदादा साखर संस्थेच्या अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. सध्या साखर कारखानदारीत काम करत असलेल्या उमेदवारांनाच संस्था प्रशिक्षण देते. राज्यातून त्यांना नवीन विद्यार्थीही मिळत नाहीत.