शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
4
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
5
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
6
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
7
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
8
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
9
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
10
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
11
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
12
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
13
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
14
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
15
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
16
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
17
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
18
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
19
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
20
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!

अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल की काय, अशी भीती आता वाटते आहे. जिल्ह्यात आज ...

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल की काय, अशी भीती आता वाटते आहे. जिल्ह्यात आज पाच हजारपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येते, असे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (दि. २१) त्यांनी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि तालुक्यातील निमोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

आराेग्य विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नोडल ऑफिसर डॉ. सीमा घोगरे आदी यावेळी उपस्थित होते.

गमे म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. लोकांनी जी शिस्त पाळायला हवी, ती पाळली जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असूनही आठवडे बाजार अनेक ठिकाणी सुरू असल्याचे निर्देशनास आले. दुकानदार, ग्राहक मास्क वापरताना दिसत नाही. हॉटेल्समध्ये गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात येणे फार मुश्कील बाब आहे. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला आणि कारवाई करायला त्यांना सांगितले आहे.

कोरोना टेस्ट वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सध्या १६ हजार टेस्ट होतात. त्या २५ हजारपेक्षा अधिक कराव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सध्या दहाच्या आसपास आहे. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होते. त्यात वाढ करून तीसपर्यंत करावे, असेही सांगितले आहे.

सरकार उपाययोजना करेल; परंतु लोकांचे सहकार्य मिळणेदेखील आवश्यक आहे. कान्हूर पठार, पारनेर भागात गेलो. तेथे सांगत होते की, दशक्रिया, तेरावा विधीसाठी हजार-हजार तसेच लग्नासाठी दोन-दोन हजार लोक एकत्र येत आहेत. लग्नाच्या वराती होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. या जिल्ह्यातून राज्यात तिसरी लाट सुरू झाली, असा कुठलाही दोष जिल्ह्यावर येऊ नये यासाठी तरी सर्वांनी काळजी घ्यावी.

- राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त