शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल की काय, अशी भीती आता वाटते आहे. जिल्ह्यात आज ...

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल की काय, अशी भीती आता वाटते आहे. जिल्ह्यात आज पाच हजारपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येते, असे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (दि. २१) त्यांनी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि तालुक्यातील निमोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

आराेग्य विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नोडल ऑफिसर डॉ. सीमा घोगरे आदी यावेळी उपस्थित होते.

गमे म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. लोकांनी जी शिस्त पाळायला हवी, ती पाळली जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असूनही आठवडे बाजार अनेक ठिकाणी सुरू असल्याचे निर्देशनास आले. दुकानदार, ग्राहक मास्क वापरताना दिसत नाही. हॉटेल्समध्ये गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात येणे फार मुश्कील बाब आहे. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला आणि कारवाई करायला त्यांना सांगितले आहे.

कोरोना टेस्ट वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सध्या १६ हजार टेस्ट होतात. त्या २५ हजारपेक्षा अधिक कराव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सध्या दहाच्या आसपास आहे. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होते. त्यात वाढ करून तीसपर्यंत करावे, असेही सांगितले आहे.

सरकार उपाययोजना करेल; परंतु लोकांचे सहकार्य मिळणेदेखील आवश्यक आहे. कान्हूर पठार, पारनेर भागात गेलो. तेथे सांगत होते की, दशक्रिया, तेरावा विधीसाठी हजार-हजार तसेच लग्नासाठी दोन-दोन हजार लोक एकत्र येत आहेत. लग्नाच्या वराती होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. या जिल्ह्यातून राज्यात तिसरी लाट सुरू झाली, असा कुठलाही दोष जिल्ह्यावर येऊ नये यासाठी तरी सर्वांनी काळजी घ्यावी.

- राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त