शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीतीने राज्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या घटली

By सुदाम देशमुख | Updated: November 29, 2020 12:20 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३ ते ४ हजार मजूर कमी झाल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३ ते ४ हजार मजूर कमी झाल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी कुटुंबांची नोंदणी केली जाते. यावर्षी ९५ लाख जॉबकार्ड वाटप करण्यात आले होते. मात्र, ऐन मार्चा-एप्रिलमध्येच यंदा कोरोना महामारीचे संकट आले. त्यामुळे नोंदणी केलेल्यांपैकी ३० लाख ९२ हजार एवढेच जॉबकार्ड ॲक्टिव्ह राहिलेले आहेत. या कार्डानुसार २ कोटी २७ लाख ४३ हजार मजुरांनी कामासाठी नोंदणी केली होती. त्यात फक्त ५९ लाख १६ हजार मजूर प्रत्यक्ष कामावर होते. नोंदणी केलेल्या मजुरांपैकी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांचे हे प्रमाण १३.५९ टक्के इतके राहिलेले आहे, असे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

यंदा मार्च-एप्रिल-मेमध्ये कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होता. मजुरांना स्थानिक परिसरात काम देण्यात येते. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांवर सरासरी तीन लाख कुटुबांनी कामावर हजेरी लावली. जूननंतर पावसाळा सुरू झाल्याने तसेच कामे कमी झाल्याने मजुरांची संख्या निम्म्यावर आली. जुलै ते ऑक्टोबरपर्यंतच्या सरासरीपेक्षा नोव्हेंबरमधील मजुरांची उपस्थिती निम्म्यावर आली आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक मजूर दिवाळी सणामुळे कामावर आलेच नाहीत.

दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारणामुळे मजुरांची पुन्हा कामावर येण्याची मानसिकता नसल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ७ हजार कुटुंब कामावर होते. ही संख्या ४ हजारांपर्यंत कमी झाली आहे. राज्यातही अशीच परिस्थिती असल्याचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे केंद्र सरकारतर्फे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत धान्याचे मोफत वाटप झाले. त्याचाही फटका रोजगार हमी योजनेला बसला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याची स्थिती पाहता नोव्हेंबमध्ये मजूर कुटुंबांची संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. सध्या कामावर असलेल्या कुटुंबांमध्ये औरंगाबाद (१७८७५), नंदुरबार (७१७०), नागपूर (९६०२) या तीन जिल्ह्यात सर्वाधिक कुटुंब कामावर आहेत. तर अहमदह्र जिल्ह्यात (६३२२) कुटुंब काम करीत आहेत.

रोजगार हमी योजनेची स्थिती

एकूण जॉबकार्ड वाटप- ९५ लाख ८९ हजार

ॲक्टिव्ह जॉबकार्ड- ३० लाख ९२ हजार

मजुरांची नोंदणी- २ कोटी २७ लाख ४३ हजार

ॲक्टिव्ह मजूर- ५९ लाख १६ लाख

रोजगार हमीवरील कुटुंबसंख्या (२०२०)

एप्रिल             १,९८,७०१

मे             ६,८९,६३७

जून             ५,५२,५७२

जुलै             ३, ०२,०६४

ऑगस्ट             २.०६,२०३

सप्टेंबर             २,२९,९३७

ऑक्टोबर             २,२८,३६१

नोव्हेंबर             १,३३,२१७

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLabourकामगार